मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे नाव म्हणजे प्रसाद ओक. प्रसादने या क्षेत्रात त्याच्या प्रतिभेच्या जोरावर स्वतःचे स्थान निर्माण करत त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली. आज प्रसाद ओक म्हणजे हिट असे समीकरण झाले आहे. चित्रपट, मालिका, नाटकं अशा मनोरंजनाच्या सर्वच माध्यमांमध्ये तो कार्यरत आहे. आता तर त्याने अभिनयासोबतच दिग्दर्शन देखील करण्यास सुरुवात केली आहे. अभिनयात हिट ठरलेल्या प्रसादला दिग्दर्शनात देखील यश मिळाले.
प्रसादने ‘हाय काय नाय काय’, ‘कच्चा लिंबू’, ‘हिरकणी’, ‘चंद्रमुखी’ आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. मुख्य म्हणजे त्याने दिग्दर्शित केलेले चारही सिनेमे वेगवेगळ्या विषयांवर आधारित होते. मुख्य म्हणजे त्याचे दिग्दर्शकीय सर्वच सिनेमे गाजले. यातलाच एक सिनेमा म्हणजे ‘कच्चा लिंबू’. २०१७ साली आलेल्या या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. मात्र बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा कमाल दाखवू शकला नाही. सिनेमा फ्लॉप गेल्यामुळे प्रसादला खूपच दुःख झाले होते. या सिनेमाच्या अपयशाबद्दल नुकतेच एका मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या.
View this post on Instagram
या मुलाखतीमध्ये प्रसाद ओक म्हणाला, “कच्चा लिंबू सिनेमाच्या स्क्रिप्टवर मी आणि चिन्मयने (मांडलेकर) जवळपास तीन वर्ष काम केले होते. प्रेक्षकांना वेगळे काहीतरी देण्याचा आणि एक सामाजिक संदेश देण्याचा आम्ही या सिनेमातून प्रयत्न केला होता. मात्र दुर्दैवाने लोकांची अशी दाहकता बघण्याची मानसिकताच तेव्हा नव्हती. मला आज बऱ्याचदा वाटते जर आता कच्चा लिंबू सिनेमा आला असता, तर तो नक्कीच शंभर टक्के हिट झाला असता. याचे कारण, म्हणजे ओटीटी. या मध्यमामुळे लोकांना असे दाहक वास्तव बघायची सवय झाली आहे. कच्चा लिंबूचा प्रदर्शनाचा काळ चुकला.”.
पुढे प्रसाद म्हणाला, “कच्चा लिंबू’ चित्रपटाच्या अपयशानंतर आम्हाला फार वाईट वाटले होते. निर्मात्यांनी या सिनेमावर प्रचंड पैसे लावले होते. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे आम्ही घेतलेल्या मेहनतीचे नक्कीच चीज झाले. मात्र सिनेमाच्या फ्लॉप होण्यामुळे तेव्हा मी खचलो होतो. चार ते पाच दिवस मी जेवलो नाही. मी ४/५ दिवस जेवलो देखील नाही. लोकांना हे का बघायचं नाही? हा प्रश्न मला सारखा पडत होता.”
View this post on Instagram
पुढे म्हणाला, “दिव्यांग अपत्य असलेल्या पालकांसाठी बाहेरच्या देशात विविध कोर्स असतात. अशा मुलांच्या आईवडिलांना जास्त त्रास होतो. ते दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केला. पण शेवटी प्रत्येक कलाकृती नशीब घेऊन येत असते. ते चालणं न चालणं हे शेवटी प्रेक्षकांच्या हातात असतं”.
दरम्यान प्रसाद ओक सध्या त्याच्या अनेक चित्रपटांमध्ये व्यस्त असून, सोबतच तो नाटकाचे दिग्दर्शन देखील करत आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात तो परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ब्रेकिंग! आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन, 60व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
कंगना रणौत इंडस्ट्रीतील कोणालाही तिच्या घरी बोलवू इच्छित नाही! अस का म्हणाली अभिनेत्री?