Tuesday, July 9, 2024

‘आमच्या घरच वातावरणच बदललंय..’ नितू कपूर यांनी आलिया भट्टबद्दल पहिल्यांदाच केला मोठा खुलासा

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या विवाहाला आता महिने उलटून गेले आहेत. या शाही विवाह सोहळ्याची बॉलिवूड जगतात जोरदार चर्चा रंगली होती. रणबीरसोबत विवाह केल्यानंतर आलिया भट्ट आता कपूर घराण्याची लाडकी सूनबाई झाली आहे. आलियाच्या घरात येण्याने कोणते बदल झाले आहेत, आलियामुळे घरातील वातावरण कशाप्रकारे बदलले आहे याबद्दलचा खुलासा पहिल्यांदाच सासू नीतू कपूर यांनी केला आहे. काय म्हणाल्यात त्या नेमकं चला जाणून घेऊ.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचा विवाह झाल्याने आता नितू कपूर यांच्या आयुष्यात मोठे बदल झाले आहेत ज्याचा खुलासा त्यांनी स्वतः एका मुलाखतीत केला आहे. या मुलाखतीत त्यांंना आलिया भट्टबद्दल विचारण्यात आले होते यावेळी त्यांनी हे खुलासे केले आहेत. त्या म्हणाल्या की, “मुलगा रणबीर कपूरचे हात पिवळे झाल्यानंतर नीतू कपूर खूप खूश आहेत. मी आजपर्यंत सर्वात आनंदी आहे. आलियाने रणबीरला खूप प्रेम आणि सकारात्मकता दिली आहे. माझ्या मुलामध्ये झालेला बदल मला जाणवू लागला आहे,”

याबद्दल बोलताना त्या पुढे म्हणाल्या की “ते दोघे एकत्र खूप क्यूट दिसत आहेत. मी खूप आनंदी आहे आणि स्वतःला भाग्यवान समजते की आलिया भट्ट आमच्या कुटुंबात आली आहे. आता आयुष्य खरोखरच बदलले आहे आणि मला खूप काही सांगायचे आहे परंतु शब्दात वर्णन करू शकत नाही. आता लग्न झाले आहे त्यामुळे माझी सर्व टेन्शन संपले आहे. आलिया आणि रणबीरने त्यांच्या घरी एकांतात लग्न केले का, असे विचारले असता. या दोघांनी अनेक लोकांसमोर आदर्श ठेवल्याचे ते म्हणाले. नीतूने सांगितले की, स्वत:ला आनंदी ठेवण्यासाठी मोठे लग्न करणे आवश्यक नाही,” दरम्यान नीतू कपूर 9 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्याचा ‘जुग जुग जिओ’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात वरुण धवन, अनिल कपूर, कियारा अडवाणीसोबत मनीष पॉल दिसणार आहे.

हेही वाचा-

Viral Video: करण जोहरच्या मुलाला आवडत नाही वडिलांची ‘ही’ गोष्ट, तोंडावरच उडवली खिल्ली

‘लगान’ चित्रपटाला २१ वर्ष पूर्ण, स्टार कास्टने केले आमिर खानच्या घरी गेट टुगेदर |Laggan

‘तारक मेहता’ फेम दिलीप जोशींचा कॉलेज जीवनातील फोटो पाहून व्हाल चकित, संघर्ष काळात असे दिसायचे अभिनेते

 

हे देखील वाचा