Monday, July 8, 2024

तब्बल सात वर्षानंतर का तुटले ऋत्विक आणि आशाचे नाते? ऋत्विकच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया कारण

कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. त्यांचे अफेअर, लग्न याबाबत जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. यातीलच अभिनेता आणि सूत्रसंचालक ऋत्विक धनजानी हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असतो. तो त्याच्या लव्ह लाईफमुळे खूप चर्चेत होता. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून ऋत्विक धनजानी आणि आशा नेगी यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. त्यांनी जवळपास ७ वर्ष त्यांचे हे नाते निभावले होते. परंतु सात वर्षानंतर त्यांच्या झालेल्या ब्रेकअपने सगळेच हैराण झाले होते. परंतु ब्रेकअपनंतर देखील ते दोघे चांगले मित्र आहेत. ते अनेकवेळा सोशल मीडियावर एकामेकांच्या फोटोवर कमेंट करत असतात. अशातच सोमवारी(5 नोव्हेंबर) त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर या निमित्त जाणून घेऊया ऋत्विक आणि आशाच्या ब्रेकअपमागील कारण.

आशा आणि ऋत्विक यांची पहिली भेट ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. दोघांनी पती पत्नीचे पात्र निभावले होते. सुरुवातीला ते दोघे एकमेकांशी बोलत नव्हते. परंतु नंतर हळूहळू त्यांच्यात मैत्री आली. त्यानंतर कधी ते एकमेकांच्या प्रेमात पडले हे त्यांना देखील समजले नाही. 2013 साली ते रिलेशनमध्ये आले आणि तिथूनच त्यांच्या सुंदर प्रेम कहाणीचा प्रवास सुरू झाला. दोघांनी ‘नच बलिये’ या शोमध्ये भाग घेतला. तेव्हा त्यांनी त्यांचे प्रेम संपूर्ण जगासमोर कबूल केले होते. (Rithvik Dhanjani birthday why Rithvik Dhanjani and asha Negi broke up after 7 years of pavitra rishta )

आशाने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, तिने जेव्हा पहिल्यांदा ऋत्विकला पाहिले होते, तेव्हा तिला तो खूपच घमेंडी वाटला होता. परंतु सेटवर जेव्हा दररोज भेट झाली, ओळख झाली त्यानंतर तिला समजले की, तो एक चांगला व्यक्ती आहे. नंतर त्यांच्यामध्ये प्रेमाला सुरुवात झाली.

आशा आणि ऋत्विक 7 वर्ष रिलेशनमध्ये होते. सगळ्यांना असे वाटले होते की, लवकरच ते लग्नबंधनात अडकतील. परंतु अचानक दोघांनी त्यांचे हे नाते संपवले. दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ते वेगळे होत असल्याची बातमी दिली होती. ऋत्विकने पोस्ट करून सांगितले होते की, आशामुळे त्याचे आयुष्य खूप छान झाले होते. तिच्यामुळे अनेक गोष्टी त्याने मिळवल्या आहेत. परंतु या ब्रेकअपनंतर आशा मात्र पूर्णपणे तुटून गेली होती. या सगळ्यातून बाहेर पडायला तिला खूपच वेळ लागला होता. तिने ब्रेकअपनंतर लिहिले होते की, “लोकं वेगळी होतात, नाती तुटतात. परंतु आयुष्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण नेहमीच त्या व्यक्तीच्या आठवणी आपल्या सोबत ठेवतो.”

ब्रेकअपनंतर अनेक कपल एकमेकांवर आरोप लावतात. परंतु आशा आणि ऋत्विक यांचे नाते खूप वेगळे होते. दोघे वेगळे झाले परंतु त्यांच्यातील मैत्री आजही तशीच आहे. एकमेकांच्या यशात आणि अपयशातते नेहमीच सोबत असतात.

हेही नक्की वाचा-
ऐश्वर्याला ट्रोल करणाऱ्यांची बोलती रिचा चड्डाने केली बंद; म्हणाली, ‘लोक ऐश्वर्या रायच्या सौंदर्यावर…’
जेव्हा प्रीताला एकटीला पाहून ऋत्विक धनजानीने केले होते प्रपोज, उत्तर ऐकून स्तब्ध झाला होता अभिनेता

हे देखील वाचा