Friday, July 5, 2024

Big Fight | फंक्शनमध्ये भेटले सलमान आणि मिथुन, पुढे काय घडलं पहाच…

बॉलिवूडमध्ये टिकायचं असेल, तर सर्वांशी चांगले संबंध ठेवूनच काम केलं जातं. जर तसं केलं नाही, तर ते अंगलट आल्याशिवाय राहत नाही. पण मित्रांनो याच बॉलिवूडमध्ये असा एक सुपरस्टार आहे, ज्याच्यासोबत ज्याने ज्याने पंगा घेतलाय, त्याला भविष्यात संकटांचा सामना करावा लागलाय. तो सुपरस्टार म्हणजेच सलमान खान (Salman Khan). बॉलिवूडमध्ये सलमानशी पंगा घेणं म्हणजे, जणू पाण्यात राहून मगरीशी वाद घालण्यासारखंच बघा. भावांनो दबंग खानचा राग जेवढा चित्रपटात पाहायला मिळत नाही, तेवढा तर याचा राग खऱ्या आयुष्यात सर्वांसमोर आलेला आपण पाहिलंच आहे. आपण विवेक ओबेरॉय, अरिजित सिंग यांसारख्या कलाकारांना सलमानची माफी मागताना वेळोवेळी पाहिलंय. पण यांच्याबद्दलचा राग कमी होईल तो सलमान कसला… जरा थांबा आता आम्ही जे सांगणार आहोत, ते जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल की, बॉलिवूडचा एक असा व्यक्ती आहे, ज्याने मुद्दाम सलमानशी पंगा घेतला, अन् त्याचं सलमान काहीही बिघडवू शकला नाही.

ही बॉलिवूडमधील सलमानची सर्वात मोठ्या फाईटपैकी एक आहे, जी अवॉर्ड फंक्शनच्या वेळी झाली होती, तीही म्युझिक कंपोजर मिथुनसोबत. मिथुनला २०१३ साली आलेल्या सुपरहिट ‘आशिकी २’ चित्रपटातील ‘तुम ही हो’ या गाण्यासाठी सर्वोत्तम गीतकाराचा अवॉर्ड मिळाला होता. त्याचं नाव पुकारलं गेलं. तो स्टेजवर आला. त्यावेळी सलमान होस्टिंग करत होता आपल्याच मस्तीच्या मूडमध्ये. पण मिथूनचा मूड जरा वेगळाच होता. कारण, याच्या थोड्या वेळापूर्वीच अरिजित सिंगचा किस्सा झाला होता. आणि ते सर्वजण आपल्या अवॉर्डसाठी ६ तास वाट पाहत होते. मग विचार करा मंडळी आपलं कोणतं काम जर अर्धा तास जरी लांबणीवर गेलं… तरीही आपला किती संताप होतो, नाही का…? मग त्या मिथूनचं तर कसं झालं असणार, याची आपण कल्पनाच केलेली बरी. पुढे त्याचं नाव पुकारल्यावर तो स्टेजवर गेला आणि अवॉर्ड घेतल्यावर सर्वांना थँक्यू म्हणायचं सोडून तो, “सर या गाण्याने सर्वांना झोपवलं नाही, तर जागवलंय.” अरिजितनं हे गाणं खूपच पेशन्सनं गायल्याचं तो म्हणाला.

यानंतर सलमानही त्याच्या अंदाजात म्हणाला की, “आम्ही तरी काय करू बुवा… तुझाच सिंगर झोपत झोपत आलाय.” मिथुननं इतकं बोलल्यानंतरही सलमानने सिच्वेशन सांभाळली. अन् चेष्टा करत त्या मिथुनचं पाय धरू लागला. इतकंच नाही, तर तो त्याची माफीही मागू लागला. सगळं हसत खेळत सुरू होतं. पुढं सलमान मिथुनची हे सांगण्यासाठी मदत करत होता की, तो जेव्हा उठला, तेव्हा त्याच्या खुर्चीवरील नेम टॅग त्याच्या पँटला लागलं होतं. तेच काढण्याचा प्रयत्न सल्लू भाई करत होता. पण दिल है की मानता नहीं यासारखं मिथुन त्याला काढूच देत नव्हता. त्यावेळी सलमान म्हणाला की, “चांगलं करायला जावा आणि फसा.”

पुढं मिथुन स्टेजवरून जाऊ लागला, तेव्हा सलमाननं त्याला पँटला लागलेला तो टॅग काढण्यास सांगितला. मात्र, तरीही मिथुनला कदाचित माहिती नव्हतं की, त्याच्या पँटीला काहीतरी लागलंय. यावेळी अवॉर्ड देण्यासाठी स्टेडवर आलेल्या राकेश ओमप्रकाश मेहरांनी त्याचे ते स्टिकर काढले. यावर सलमान मजेत म्हणाला की, तुझ्या सिंगरनेच चिटकवलं असेल. यानंतर मिथुननं सलमाच्या हातातनं माईक घेतला अन् म्हणाला की, “सर ६-६ तास बसवून ठेवाल, तर ते तसंच होईल.” यानंतर एवढ्या वेळापासून सायलेंटली घेणारा सलमान अचानक पेटला. तो म्हणाला, “व्वा भावा, आज तर सगळेच देत आहेत.” यानंतर तो जोरात ओरडला आणि मिथुनला म्हणाला, “चलो निकलो…”

सलमाननं असं म्हणतात, आख्ख्या अवॉर्ड फंक्सनमध्ये भयान शांतता पसरली. तिथं उपस्थित दिग्गज प्रोड्यूसर अन् डिरेक्टरही हे पाहत होते. त्यात सलमानचे वडील सलीम खान अन् भाऊ अरबाजही होता. सलमानच्या हातातनं मिथुननं माईक घेतला अन् म्हणाला, “मी नाही घाबरलो सर…” ज्या कॉन्फिडन्सनं मिथुन बोलला होता, त्यावरून सर्वांना समजलं होतं की, हा पठ्ठ्या खरंच सलमानला घाबरलेला नाही. त्यामुळं सलमानकडंही हे चेष्टेत उरकण्याशिवाय इतर ऑप्शनच नव्हता. त्यानं मिथुनला हग करत स्टेजवर खाली पाठवलं.

यानंतर मात्र, मिथुनने मीडियासमोर कधी काय म्हटलं नाही. अन् जरी मीडियानं त्याला विचारलं, तर तो एवढंच म्हणायचा की, मला जे फील झालं, ते मी म्हणालो. त्यानंतर आजपर्यंत अशी कोणती बातमी आलेली नाही की, मिथुनला सलमानची गरज आहे. तो आजही त्याचप्रकारे आपलं काम करतोय, जसं तो आधी करायचा. तसंच अनेक अवॉर्डही त्यानं जिंकले. त्यानं अनेक चांगली गाणी दिली. जशी की, ‘एक व्हिलन’, ‘हाफ गर्लफ्रेंड’, ‘हमारी अधुरी कहाणी’यांसारख्या चित्रपटात तो गेस्ट कंपोजर होता. महत्त्वाचं म्हणजे ‘कबीर सिंग’मधलं ‘तुझे कितना चाहने लगे हम’ या गाण्यातही त्याचं योगदान होतं.

हा पाहा व्हिडिओ: फंक्शनमध्ये भेटले सलमान आणि मिथुन, पुढे काय घडलं पहाच…

हे देखील वाचा