सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणारी समंथा काही दिवसांपासून तिच्या ‘फॅमिली मॅन २’ वेबसिरीजसाठी चांगलीच गाजत आहे. आता तिच्याबद्दल एक वेगळीच बातमी समोर येत आहे. समंथाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिचे नाव बदलले आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे ‘अक्किनेनी’ हे आडनाव काढून टाकले आहे. समंथाने २०१७ साली सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा अभिनेता नागा चैतन्यशी लग्न केलं होत,. त्यानंतर तिने तिच्या अकांऊटवर हे आडनाव लावले होते. (Samantha Changes Her Name On Social Media)
समंथाने तिच्या ट्विटर आणि इंस्टाग्राम अकांऊटवर डिस्प्ले नावात बदल करून अक्किनेनी काढून टाकत फक्त ‘S’ हे अक्षर ठेवले आहे. मात्र तिच्या फेसबुक अकाऊंटवर तिने तिचे नाव बदलले नाही. समंथाने नाव बदलण्यामागे कोणतेही कारण सांगितले नाहीये. त्यामुळे तिचे फॅन्स आणि प्रेक्षक या नाव बदलण्यावरून असा अंदाज लावत आहे की, तिच्यामध्ये आणि नागा चैतन्य सर्व काही अलबेल नाही. हे नाव बदलण्यामागचे खरे कारण फक्त समंथाच सांगू शकते.
समंथाने नागा चैतन्यसोबत २०१० साली ‘ये माया चेसवे’ या सुपरहिट सिनेमात काम केले होते. त्यानंतर त्या दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. मग २०१७ साली त्यांनी गोव्यामध्ये लग्न केले. समंथा नुकतीच मनोज बाजपेयीच्या सुपेटीत ‘फॅमिला मॅन २’मध्ये दिसली होती. आता समंथा विजय सेतुपती आणि नयनतारासोबत ‘काथू वाकुला रेंडू काधल’ या सिनेमात दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अवघड आहे! ‘ते’ गाणं श्रेया घोषालला पडतंय बरंच महागात, लाखो चाहते करताय ट्रोल
-आर्थिक संकटातून जात आहे ‘बालिका वधू’चे कुटूंब; अभिनेत्रीच्या वडिलांनी व्यक्त केलं दु:ख