कंगना रणौतच्या ‘लॉक अप’ या शोची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. आता कॉमनवेल्थ हेवी वेट चॅम्पियन संग्राम सिंगला या शोचा भाग व्हायचे आहे आणि याचे कारण आहे त्याची होणारी पत्नी पायल रोहतगी. पायल या शोची स्ट्रॉंग स्पर्धक असल्याचे संग्रामचे मत आहे. पायल जेव्हापासून शोचा भाग बनली तेव्हापासून तो तिला बाहेरून खूप सपोर्ट करत आहे. संग्राम म्हणतो की, जर त्याला शोमधून फोन आला आणि कोणतीही कमिटमेंट नसेल तर तो नक्कीच शोचा भाग बनणार आहे. तो म्हणाला की, पायल आणि निशा स्ट्रॉंग आहेत. त्याचवेळी मुनव्वर आणि करणवीर बोहरासाठी तो म्हणाला की, तो मुलींना ढाल म्हणून खेळवतो, त्यामुळे तो माझ्यासाठी मजबूत नाही.
आपल्या लग्नाबाबत संग्राम म्हणाला की, “पायल आणि मी याच वर्षी लग्न करणार आहोत. कदाचित माझा वाढदिवस असेल, पण आम्ही लग्न करू. मला मुंबईत नाही तर गुजरात किंवा हरियाणामध्ये लग्न करायचं आहे. यासोबत लग्नात जास्त खर्च करण्यापेक्षा गरजू मुलाला मदत करणे चांगले.”
संग्रामने सांगितले की, तो आणि पायल ११ वर्षांपासून एकत्र आहेत आणि दोघांमध्ये ब्रेकअप होण्याची कोणतीही शक्यता नव्हती. सुरुवातीला लोक म्हणाले की, “आम्ही दोघे खूप वेगळे आहोत आणि एकत्र राहू शकणार नाही. असे नाही की, आम्ही वाद घालत नाही, परंतु आम्ही महिन्यातून ५ -७ दिवस भेटतो. आम्ही वेगळे आहोत म्हणून आम्ही एकत्र आहोत.”
पायलच्या खेळाबाबत तो म्हणाला की, “मी हा शो पाहत आहे. पायलला एक सवय आहे की ती सर्वकाही क्लिअर करण्याचा प्रयत्न करते, ती असे का करते आहे हे माहित नाही. माझा विश्वास आहे की, सर्वांचे ऐका, परंतु मनाचे करा. मला आशा आहे की पायल विजयासह पुनरागमन करेल.” संग्राम सिंह चार वर्षांनंतर कुस्तीमध्ये परतत आहे, ज्याच्या तयारीत तो व्यस्त आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-