Wednesday, July 3, 2024

अक्षय कुमारसोबत केले होते पदार्पण; मात्र सुंदरतेने वेड लावलेली शांतीप्रिया आज का राहतेय बॉलिवूडपासून दूर?

बॉलिवूड अभिनेत्री शांतीप्रियाने आपल्या सौंदर्याने चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. तिने अक्षय कुमारसोबत ‘सौगंध’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. शांतीप्रियाचे हसणे आणि तिच्या मोठ्या डोळ्यांनी चाहत्यांना वेड लावले होते. १९९४ मध्ये, शांतीप्रिया ‘इक्के पे इक्का’ चित्रपटात दिसली होती. पण तेव्हापासून तिने स्वतःला चित्रपटांपासून दूर केले आहे. अभिनेत्री गेल्या २७ वर्षांपासून पडद्यापासून दूर आहे. तिने मध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यात ती यशस्वी झाली नाही.

तमिळ तेलुगु चित्रपटांचा राहिलीय भाग
अक्षय कुमारसोबत हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यापूर्वी शांतीप्रियाने तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. २२ सप्टेंबर १९६९ रोजी आंध्र प्रदेशात जन्मलेल्या शांतिप्रियाने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. १९८७ च्या तमिळ चित्रपट ‘एन्गा ओरू पाटुकरण’ द्वारे तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तमिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमध्ये तिने २४ पेक्षाही जास्त चित्रपट केले. शांतीप्रिया हे तामिळ चित्रपट विश्वात एक मोठे नाव होती. (Why did Shantipriya, who was obsessed with beauty, stay away from Bollywood, she made her debut with Akshay Kumar)

सिद्धार्थ रे सोबत लग्न
शांतीप्रियाने अभिनेता सिद्धार्थ रे सोबत १९९९ मध्ये लग्न केले. सिद्धार्थने ‘बाजीगर’ आणि ‘वंश’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. सिद्धार्थ आणि शांतीप्रियाला दोन मुले आहेत. परंतु त्यांचे वैवाहिक आयुष्य फार काळ टिकले नाही. सिद्धार्थ रे याचे २००४ मध्ये वयाच्या ४० व्या वर्षी, हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

‘या’ हिंदी चित्रपटांमध्ये केलंय काम
अक्षयसोबत ‘सौगंध’ चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर, शांतीप्रियाने केवळ काही हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. यात ‘मेरे सजना साथ निभाना’, ‘फूल और अंगार’ आणि ‘मेहरबान’ यांचा समावेश आहे. या सर्व चित्रपटांमध्ये ती मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत दिसली. याशिवाय तिने सनी देओलसोबत ‘वीरता’ चित्रपटात काम केले आहे. अक्षय कुमारसोबत करिअरची सुरुवात करणाऱ्या शांतीप्रियाने पडद्यापासून दूर जाण्यापूर्वी अक्षय कुमारसोबत ‘इक्के पे इक्का’ हा शेवटचा चित्रपटही केला होता.

टेलिव्हिजन शोचाही भाग
दक्षिण सिनेमा आणि बॉलिवूडमध्ये काम करण्याव्यतिरिक्त शांतीप्रियाने टेलिव्हिजनमध्येही काम केले. ती ‘विश्वामित्र’, ‘आर्यमन’, ‘माता की चौकी’ आणि ‘द्वारकाधीश’ सारख्या मालिकांचा भाग राहिली आहे. पतीच्या मृत्यूनंतर शांतीप्रिया तिचे दोन मुलं शुभम आणि शिष्य यांच्यासोबत राहते. शांतिप्रिया अनेकदा मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

कारकीर्दीच्या सुरुवातीला टीकेला सामोरे
गेल्या वर्षी शांतीप्रिया प्रसिद्धीझोतात आली. तिने सांगितले की, “जेव्हा तिने आपले फिल्मी करिअर सुरू केले, तेव्हा तिला लोकांच्या वर्णद्वेषी टीकेला सामोरे जावे लागले. यामुळेच तिने बॉलिवूडपासून स्वतःला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. बिग बॉसच्या सीझनमध्ये शांतीप्रिया दिसू शकते, अशी बातमी होती. परंतु या व्यतिरिक्त, अशीही बातमी आहे की, ती लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवरून अभिनय विश्वात परतणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नवा ट्विस्ट? लतिका म्हणतेय, ‘तुम्ही दोघांनी मिळून माझा जीव…’; तर अभिमन्यू अन् नंदिताने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

-सुंदर अन् सोज्वळ! पांढऱ्या ड्रेसमध्ये पाहायला मिळालं रुपाली भोसलचं ‘आकर्षक’ सौंदर्य

-‘पलट’ म्हणणाऱ्या ऋतुजाच्या सौंदर्याची चाहत्याला पडली भुरळ, ‘तुझ्या सौंदर्याला सीमा नाही’ म्हणत केलं कौतुक

हे देखील वाचा