Thursday, June 12, 2025
Home बॉलीवूड ‘हा तर तोंडावरूनच गुंड वाटतो’, म्हणत पूनम सिन्हा यांच्या आईने नाकारले होते शत्रुघ्न यांचे स्थळ

‘हा तर तोंडावरूनच गुंड वाटतो’, म्हणत पूनम सिन्हा यांच्या आईने नाकारले होते शत्रुघ्न यांचे स्थळ

‘शॉटगन’ म्हणून ओळखले जाणारे बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा इंडस्ट्रीमधील लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेते म्हणून ओळखले जातात. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी चित्रपट जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या खासशैलीत त्यांच्या स्टाईलमध्ये बोललेले संवाद आजही प्रसिद्ध आहेत. परंतु इतके प्रसिद्ध, लोकप्रिय अभिनेते असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांना लग्नाची बोलणी करताना ‘हा तर तोंडावरूनच गुंड वाटतो’ असे म्हणत त्यांच्या सासू बाईनीं मुलगी देण्यास नकार दिला होता. असा धक्कादायक खुलासा खुद्द अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी एका कार्यक्रमात बोलताना केला होता.

शत्रुघ्न सिन्हा हे हिंदी चित्रपट जगतातील लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात. आपल्या दमदार आवाजाने आणि संवादाने त्यांनी त्यांचा काळ चांगलाच गाजवला. त्यांच्या चित्रपटातील गाजलेले डायलॉग आजही लोकप्रिय आहेत. आपल्या कर्तुत्वाने यशाच्या शिखरावर पोहचलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांचा लग्नाची बोलणी करताना मात्र चांगलाच अपमान झाला होता. याबद्दलचा खुलासा खुद्द शत्रुघ्न सिन्हा यांनीच केला होता.

अभिनेते शत्रुघ्न सिन्हा एकदा पाहुणे म्हणून ‘द कपिल शर्मा शोमध्ये’ सहभागी झाले होते. या कार्यक्रमात बोलताना शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या आयुष्यातील हा मजेशीर किस्सा सांगितला होता.

यावेळी बोलताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की “माझा मोठा भाऊ राम सिन्हा जो अमेरिकेत शास्त्रज्ञ आहे. मी त्यांना आणि निर्माते एन. एन. सिप्पीसाहेब यांना लग्नाची बोलणी करण्यासाठी पूनम सिन्हा यांच्या आईकडे पाठवले होते. परंतु माझ्या होणार्‍या सासूबाईनी त्यावेळी थेट नकार दिला होता. इतकेच नव्हेतर त्यावेळी त्यांनी त्या दोघांना सांगितले की, ‘तु तुझ्या भावाचे तोंड पाहिले आहेस का? इतके शिकले सवरलेले असूनही त्याचे स्थळ घेऊन येत, तुम्ही मुलीच्या लग्नाची बोलणी करायला आले आहात. तुझा भाऊ तर तोंडावरूनच गुंड वाटतो.” यावेळी बोलताना शत्रुघ्न सिन्हा पुढे म्हणाले की “जेव्हा संबंध बिघडले, पुन्हा जुळले पुढे जाऊन आमचे लग्नही झाले तेव्हा माझ्या विरोधात असणार्‍या सासुबाई माझ्या बाजूने उभ्या राहिल्या याचा अर्थ माझ्यात चांगल्या गोष्टी सुद्धा आहेत.”

या कार्यक्रमात बोलताना शत्रुघ्न सिन्हा यांनी सुरुवातीला खलनायकाची भूमिका करता करता थेट नायक कसे झाले याबाबत माहिती सांगितली. यामध्ये ते म्हणाले की “मला मारून मारून हीरो बनवले गेले. खलनायकाच्या भूमिकेत मी ज्यावेळी हीरोला मारायचो किंवा जेव्हा माझी एंट्री व्हायची त्यावेळी माझे कौतुक केले जायचे आणि हिरोला शिव्या पडायच्या. हा प्रकार चित्रपटगृहाच्या मालकाने वितरकाला अन वितरकाने पुढे निर्मात्यांना सांगितला होता. शेवटी प्रेक्षकांच्या मागणीमुळे मला नायक बनवले गेले.”

दरम्यान शत्रुघ्न सिन्हा हे राजकारणात सुद्धा सक्रिय सहभागी असतात ते अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये केंद्रीयमंत्री सुद्धा राहिले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काय सांगता! प्रियांका चोप्राला एका माकडाने मारली होती थोबाडीत

-जेव्हा अजय देवगणने पहिल्या भेटीतच काजोलला केले होते रिजेक्ट, तिला पुन्हा भेटायची नव्हती त्याची इच्छा

-राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार: रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार; तर कंगणा, धनुष, मनोज बाजपेयी ठरले सर्वोत्कृष्ट कलाकार

हे देखील वाचा