कलाकार आपल्या दमदार भूमिकेने चाहत्यांची पसंती मिळवतात. यामध्ये त्यांनी साकारलेले एखादे पात्र एखादे प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करते. त्यामुळे बहुतेक प्रेक्षक वर्ग त्यांनी साकारलेल्या पात्रामुळेच त्यांना ओळखतो. काही कलाकार हे आपल्या समाजासाठी, नागरिकांसाठी अनेक सामाजिक कार्ये देखील करत असतात. त्यांच्या मनामध्ये जनतेविषयी असलेले प्रेम आणि जिव्हाळा त्यांना राजकारणाकडे ओढते. त्यातीलच एक अभिनेत्री शिल्पा शिंदे.
शिल्पा शिंदेने आपल्या कलेची जोपासना करत राजकारणाशी देखील आपली नाळ बांधली आहे. ती शनिवारी (२८ ऑगस्ट) तिचा वाढदिवस साजरा करते.
तिला लहानपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती, तसेच सामाजिक कार्यातही तिला रस होता. शिल्पाने अभिनय क्षेत्रात घेतलेल्या मेहनतीमुळेच ती एक यशस्वी अभिनेत्री आहे. वाढदिवसानिमित्त तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेऊ. (shilpa shinde turns 44 know why actress broke her marriage after the wedding card was printed)
शिल्पाचा जन्म २८ ऑगस्ट १९७७ मध्ये मुंबईमधील एका दलित कुटुंबात झाला. तिचे वडील उच्चन्यायालयात न्यायाधीश होते. अभिनेत्रींचे शिक्षण मुंबईमध्येच पूर्ण झाले. तिने मानसशास्त्र या विषयात पदवी घेतली. तिने साल १९९९ मध्ये आपल्या अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. सुरुवातीला तिने ‘भाभी’, ‘मायका’, ‘संजीवनी’, ‘चिडीया घर’, ‘हातीम’, ‘आम्रपाली’ आणि ‘मिस इंडिया’ या मालिकांमध्येही काम केले आहे. परंतु तिच्या अभिनयाला खरी दाद मिळाली, ती साल २०१५ मध्ये आलेल्या ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेमधून. तिने यामध्ये साकारलेली अंगूरी भाभीची भूमिका रसिक प्रेक्षकांना फार आवडली. या मालिकेमध्ये मिळालेल्या यशानंतर ‘बिग बॉस १५’ मध्ये जाण्याची तिला संधी मिळाली. या संधीचे सोने करत तिने यामध्ये विजय मिळवला. साल २०१९ मध्ये तिने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये पदार्पण केले.
या कारणासाठी सोडले होणाऱ्या पतीला
शिल्पा ‘मायका’ या मालिकेच्या शूटिंग दरम्यान सह कलाकार रोमित राजला भेटली होती. तिथे त्या दोघांमध्ये जवळीक येऊन प्रेमसंबंध निर्माण झाले. त्याचबरोबर त्यांनी एकमेकांबरोबर लग्न करण्याचे ठरवले. त्यांनी २९ नोव्हेंबर २०१९ मध्ये लग्नाची तारीख ठरवली होती. त्यासाठी आलिशान हॉटेल देखील बुक केले होते. लग्नाच्या पत्रिका सगळ्यांना वाटून झाल्या होत्या, परंतु एक घटना घडली आणि शिल्पाला रोमित बरोबर संसार थाटण्याआधीच तो मोडावा लागला.
साल २०१६ मध्ये शिल्पाने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये याविषयी सविस्तर माहिती सांगितली. शिल्पा म्हणाली की, “करवाचौथच्या दोन दिवस आधी मला समजले की रोमित मला कधीच समजून घेऊ शकणार नाही. मी त्याला माझ्या आयुष्यातील सर्व दुःख आणि अडचणींविषयी सांगितले होते. त्यावेळी तो माझ्या आई वडिलांना खूप ओरडला होता. जो मुलगा माझी आणि माझ्या घरच्यांची इज्जत आताच करत नाही, तो लग्नानंतर देखील नीट वागणार नाही. त्यामुळे आमचे लग्न मी मोडले.”
या नंतर अभिनय क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करत असताना तिच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेचे निर्माते संजय कोहली यांच्याशी तिचा वाद झाला होता. शिल्पाने संजयवर लैंगिक अगत्याचाराचा आरोप केला होता. त्यानंतर शिल्पाच्या नावाने एक एमएमएस व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. परंतु त्या व्हिडीओ मधील मुलगी शिल्पा नव्हती. त्यामुळे तिने त्या गोष्टीचा शोध घेतला आणि त्या मुलीला समोर आणले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-तरुणींनाही लाजवेल असं आहे तिचं सौंदर्य! पाहा सिल्व्हर आऊटफिटमध्ये श्वेता तिवारीचा ग्लॅमरस अंदाज
-‘बिग बीं’च्या घरात निर्माण झालीय पाण्याची समस्या? ब्लॉगमध्ये कामाबद्दल व्यक्त केली चिंता