सहा आठवड्यांपूर्वी सुरू झालेल्या ‘बिग बॉस ओटीटी’चा ग्रँड फिनाले शनिवारी (१८ सप्टेंबर) रोजी झाला. यावेळी सर्व स्पर्धकांना धूळ चाखवत दिव्या अग्रवालने ट्रॉफी जिंकली. ‘बिग बॉस ओटीटी’ हा शो करण जोहरने होस्ट केला होता आणि अंतिम फेरीत दिव्या अग्रवाल, निशांत भट्ट, राकेश बापट, शमिता शेट्टी आणि प्रतीक सहजपाल हे स्पर्धक पोहचले होते. शिवाय विजेत्याला ट्रॉफीसह २५ लाख रुपयांची विजयी रक्कमही मिळाली आहे. दिव्याने शो जिंकला, तर निशांत पहिला आणि शमिता उपविजेती ठरली. दरम्यान अभिनेत्री गौहरनेही दिव्याचे अभिनंदन करणारे ट्वीट केले आहे.
केव्हा झाली होती ‘बिग बॉस ओटीटी’ची सुरुवात
‘बिग बॉस ओटीटी’ची सुरुवात ८ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता झाली होती. सलमान खान गेली अनेक सीझन होस्ट करत असताना, ‘बिग बॉस ओटीटी’ करण जोहरने होस्ट केला होता. प्रत्येक ‘संडे का वार’ भागात करण जोहर ८ वाजता यायचा, तर उर्वरित ६ दिवसांसाठी भाग संध्याकाळी ७ वाजता प्रसारित केला जात असे. (story divya agarwal is bigg boss ott grand finale winner beating shamita shetty raqesh bapat nishant bhat pratik sehajpal)
कोण कोण होते स्पर्धक
‘बिग बॉस ओटीटी’मध्ये एकूण १३ स्पर्धक सामील झाले होते. राकेश बापट, झीशान खान, मिलिंद गाबा, निशांत भट्ट, प्रतीक सहजपाल, करण नाथ, शमिता शेट्टी, उर्फी जावेद, नेहा भसीन, मूस जटाना, अक्षरा सिंग, दिव्या अग्रवाल आणि रिद्धिमा पंडित अशी या स्पर्धकांची नावे आहेत.
‘बिग बॉस ओटीटी’नंतर आता लवकरच बिग बॉस १५ सुरू होईल. नेहमीप्रमाणे सलमान खान ‘बिग बॉस १५’ होस्ट करणार आहे. ‘बिग बॉस १५’ चा प्रीमियर ३ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता होणार आहे. हा शो सोमवार ते शुक्रवार रात्री १०.३० वाजता प्रसारित होईल, तर वीकेंड का वार शनिवार-रविवारी रात्री ९ वाजता प्रसारित होईल.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-KBC: ‘शानदार शुक्रवार’च्या भागात ‘या’ खेळाडूंनी लावले चारचांद, अमिताभ यांना अश्रू अनावर
-Bigg Boss OTT: राकेश अन् शमिताच्या वाढत्या जवळीकतेबद्दल बोलली पूर्व पत्नी, ‘अशी’ दिली प्रतिक्रिया