Saturday, July 6, 2024

‘शाहरूखने माझं आयुष्य केलं उद्ध्वस्त!’ जेव्हा मुलीने केला होता ‘किंग’ खानवर धक्कादायक आरोप

शाहरुख खान, हे फक्त बॉलिवूड नायकाचे नावच नाही, तर ही ओळख आहे आहे रोमान्सच्या ‘किंग’ची. इंडस्ट्रीत असे अनेक नायक आहेत ज्यांनी प्रेक्षकांना प्रेम करायला शिकवले, पण शाहरुखसारखे प्रेम करणे ही प्रत्येकाला जमणारी गोष्ट नाही. ९० च्या दशकापासून ते आजपर्यंतच्या चित्रपटात शाहरूखने ज्या पद्धतीने रोमान्स दाखविला आहे. जवळपास प्रत्येक मुलगी तसा रोमॅन्स मिळवण्याची कल्पना करते. आपल्या रोमान्सने लाखो-करोडो लोकांच्या हृदयाला धडकवणार्‍या शाहरुखने, अशाच प्रकारे मुंबईच्या दोन प्रेमींचे आयुष्य उद्ध्वस्त केले. हे आम्ही म्हणत नाही, तर काही वर्षांपूर्वी मुंबईतल्या एका जोडप्याने असा दावा केला होता.

ही कथा ह्यूमन्स ऑफ मुंबई या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली गेली होती. ‘शाहरुख खानने माझं आयुष्य उद्ध्वस्त केले’ या ओळीपासून या कथेची सुरुवात झाली. वास्तविक शाहरुखचा एक रोमँटिक चित्रपट पाहून, एका मुलीने स्वत: साठी अशाच प्रेमाची अपेक्षा केली होती. शाहरुख चित्रपटात आपल्या नायिकेसोबत प्रेम करतो, म्हणूनच एक मुलगी अशा प्रकारचे प्रेम मिळवण्याची इच्छा असल्याने, शाहरुखवर असा आरोप केला होता.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या या प्रेमकथेच्या सुरूवातीला मुलीने लिहिले की, “शाहरुखने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले. लहानपणापासूनच माझे स्वप्न होते की, माझा परफेक्ट मॅन मला परफेक्ट प्रपोज करेल. पार्श्वभूमीत व्हायोलिन वाजू लागेल, तो मला प्रेमाने उठवेल. नंतर माझे केस हवेत उडू लागतील आणि तो आपल्या गुडघ्यावर बसून माझ्या बोटामध्ये अंगठी घालेल. परंतु माझ्यासोबत असे कधीच घडले नाही.”

मुलीने पुढे लिहिले की, “मी माझ्या बंगाली पालकांना हे पटवून देण्याचा प्रयत्न करत राहिले की, मला या पंजाबी व्यापारी मुलाशी लग्न करायचे आहे. आम्ही एकमेकांना तीन वर्षे डेट केले आणि आमच्या अधिकतर वेळ कुटुंबाला एकत्र आणण्यातच गेला. माझ्या धामधुमीत झालेल्या विवाहादरम्यान मला कळाले की, मला माझा फिल्मी प्रपोज कधीच मिळणार नाही.”

आपले म्हणणे पूर्ण करत मुलगी पुढे म्हणाली, “जेव्हा मला असे प्रपोजल मिळाले नाही, तेव्हा मी विचार केला की, हे काम मी केले तर? यानंतर, आम्ही डेटिंग करताना प्रथमच भेटलेल्या रेस्टॉरंटमध्ये, मी एक सरप्राईज प्लॅन केला. मी ‘मॅरी मी’ हे गाणे वाजवायला सांगितले आणि माझ्या गुडघ्यावर बसून म्हणाले, “आशिष अग्रवाल, तू माझ्याशी लग्न करशील का?” त्याने मला मिठी मारली आणि म्हणाला, ‘आपली मुले इतकी फिल्मी होऊ नयेत.’ हा एक सुंदर क्षण होता.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-खरंच! आयुष्यातील पहिली किस म्हणत रणबीर कपूरने घेतले होते माधुरी दीक्षितचे नाव, सांगितले कधी आणि कसे

-याला म्हणतात गाण्याची जादू! हिमेश रेशमियाच्या ‘या’ गाण्यामुळे सापडला होता खरा चोर, दोन रात्रीत उडवले होते एक लाख रुपये

-प्रियांका चोप्राला या अवतारात पाहून चाहते झाले हैराण, फोटो झाला सोशल मीडियावर व्हायरल

हे देखील वाचा