Monday, July 1, 2024

बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्रींनी लग्नानंतर त्यांच्या यशस्वी चित्रपटांच्या करिअरला ठोकला रामराम

बॉलिवूडमधील अभिनेत्रींबाबत पूर्वी लोकांची एक धारणा होती की, अभिनेत्रींचे लग्न झाले की, त्यांच्या करिअरवर पूर्णविराम लागतो. लग्नानंतर जरी त्यांना चित्रपटांमध्ये काम करायचे असेल तरी त्यांना मुख्य भूमिका न मिळत सहाय्यक भूमिकांवरच समाधान मानावे लागते. मात्र कालानुसरूप हा विचार मागे पडला. आज इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या लग्नानंतरही त्यांचे करिअर यशस्वी करत आहेत. शिवाय मुख्य भूमिकेतूनच प्रेक्षकांसमोर येत अनेक सुपरहिट सिनेमे देत आहेत. मात्र यासर्वांमधे अशा देखील काही अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांच्या लग्नानंतर स्वतःहून चित्रपटांमधून ब्रेक घेतला. लग्नाआधी प्रसिद्ध आणि लोकप्रिय असणाऱ्या या अभिनेत्रींनी लग्नानंतर गृहिणी झाल्या तर काहींनी वेगळ्या क्षेत्रात त्यांचे उर्वरित करिअर केले. आज आपण अशाच काही अभिनेत्रींची नावे जाणून घेऊया ज्यांनी लग्नानंतर त्यांच्या अभिनयाच्या करिअरला ब्रेक लावला.

गीता बसेरा :
‘द ट्रेन’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणाऱ्या गीताचे अभिनय करिअर खूप चांगले नसले तरी तिचे सिनेमे येत होते. मात्र २०१५ साली गीताने क्रिकेटर हरभजन सिंगसोबत लग्न केले आणि करिअरला ब्रेक लावला. जवळपास आठ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न केले.

ट्विंकल खन्ना :
१९९५ साली ट्विंकलने ‘बरसात’ सिनेमातून काम करत तिच्या अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले, मात्र तिचे सिनेमे हिट होण्याऐवजी फ्लॉपच होत होते. २००१ साली तिने खिलाडी कुमारसोबत लग्न केले आणि तिने चित्रपटांमधून ब्रेक घेतला. आज ट्विंकल अभिनेत्रीसोबतच एक उत्तम इंटिरियर डिझायनर आणि लेखिका आहे.

हेजल कीच :
सलमान खानच्या ‘बॉडीगार्ड’ सिनेमामध्ये काम केलेल्या हेजलने युवराज सिंगशी लग्न केले आणि तिने अभिनयापासून लांब गेली. २०१३ साली हेजलने बिग बॉसमध्ये देखील प्रवेश केला होता. २०१६ साली तिने युराजसोबत लग्न केले.

सागरिका घाटगे :
‘चक दे’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केलेल्या सागरीकाने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. मात्र २०१७ साली झहीर खानसोबत लग्न केल्यानंतर ती अभिनयापासून लांब गेली.

संगीता बिजलानी :
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या संगीता बिजलानीने देखील भारतीय क्रिकेट टीमचे कप्तान असलेल्या मोहम्मद अझरुद्दीन यांच्याशी लग्न केल्यानंतर चित्रपटांमधून ब्रेक घेतला.

जिनिलिया डिसुझा :
२००३ साली आलेल्या ‘तुझे मेरी कसम’ सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले. त्यानंतर ती अनेक हिंदी आणि साऊथ चित्रपटांमध्ये दिसली. २०१२ साली रितेशसोबत लग्न झाल्यानंतर तिला घराकडे आणि मुलांकडे लक्ष देणे महत्वाचे वाटले आणि तिने अभिनयातून ब्रेक घेतला.

असिन :
‘गजनी’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये आलेल्या असिनने अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केले. अनेक हिट बॉलिवूड सिनेमे दिले. मात्र २०१६ साली मायक्रोमॅक्स कंपनीच्या सहसंस्थापक असणाऱ्या राहुल शर्मासोबत लग्न केल्यानंतर तिने चित्रपटांना रामराम ठोकला.

सोनाली बेंद्रे:
सोनाली बॉलिवूडमधील सुंदर आणि यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले. २००२ साली निर्माता गोल्डी बहलशी लग्न केल्यानंतर ती चित्रपटांपासून दूर गेली. मात्र ती टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये बऱ्याचदा दिसत असते.

यातल्या बऱ्याच अभिनेत्री नेहमीच मीडियाच्या कॅमेरात कैद होताना दिसतात. यातील काही अभिनेत्री लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार असल्याचे बोलले जात आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रणबीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आलियाने केला रोमँटिक फोटो शेअर; मनातील भावनाही केल्या व्यक्त

-श्रुती मराठेच्या डॅशिंग लूकमधील फोटोने वेधले चाहत्यांचे लक्ष; कुणाला आवडला ड्रेस, तर कुणाला तिचा लूक

-गौतमी देशपांडेच्या ऑफ शोल्डर ड्रेसमधील फोटोने अमृता खानविलकरलाही घातली भुरळ; कमेंट करत म्हणाली…

हे देखील वाचा