Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड ‘या’ कलाकारांनी गुपचूप लग्न करत चाहत्यांना दिला आश्चर्याचा सुखद धक्का

‘या’ कलाकारांनी गुपचूप लग्न करत चाहत्यांना दिला आश्चर्याचा सुखद धक्का

ही गोष्ट खरी आहे की, भारतातील विवाह हे सणांसारखेच साजरे केले जातात. कलाकारांचे लग्न म्हटल्यावर मीडिया आणि त्यांचे फॅन्स या लग्नाकडे डोळे लावूनच बसलेले असतात. सतत मीडियाचे कॅमेरे आणि नजरा त्यांच्यावर दिसून येतात. जितका मोठा कलाकार तितकेच त्याचे लग्न महत्वाचे असते. बॉलिवूड सेलिब्रिटी देखील त्यांचे लग्न सदैव स्मरणात राहण्यासाठी लग्न अतिशय हटके पद्धतीने करतात. प्रत्येक कलाकार आपले लग्न चांगले, अविस्मरणीय आणि भव्य करण्याचा प्रयत्न करत असतो. पण आता काळ बदलला आहे. आजच्या काळात, कलाकार हे नातेसंबंध गुप्त ठेवतात. त्यांना त्यांचे खासगी जीवन आणि त्या जीवनातील महत्वाच्या गोष्टींचा आनंद फक्त जवळच्या लोकांमधच राहत घ्यायचा असतो. काही सेलिब्रिटी असतात जे चाहत्यांच्या नजरेपासून दूर राहून गुपचूप लग्न करतात आणि नंतर सोशल मीडियावर आपल्या लग्नाची घोषणा करून सगळयांनाच आश्चर्याचा धक्का देतात.

हिंदी चित्रपटातील काही असे कपल्स आहेत, ज्यांनी आधी गुपचूप लग्न केले आणि नंतर सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करून सगळ्या चाहत्यांना हैराण केले. अशाच काही जोड्या आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

 

यामी गौतम आणि आदित्य धर

यामी गौतम आणि आदित्य धर या दोघांनी ४ जून २०२१ रोजी त्यांच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले. या दोघांनी हिमाचल प्रदेशात आपल्या कुटुंबासोबत पारंपारिक पद्धतीने लग्न केले. ज्यात फक्त काही निवडक लोकंच उपस्थित होते. यामी गौतम आणि आदित्य यांचे साधे लग्न चाहत्यांना चांगलेच आवडले होते. एवढेच नाहीतर, त्यांच्या लग्नाची बातमी बऱ्याच कलाकारांसाठी देखील एक सुखद धक्काच होती.

अली अब्बास जफर आणि एलिसिया
हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास हे त्यांच्या चित्रपटांमुळे नेहमीच चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. या दिग्दर्शकाने ३ जानेवारी २०२१ रोजी एलिसियाशी गुपचूप लग्न केले होते. अलीने ४ जानेवारी २०२१ रोजी सोशल मीडियावर आपल्या लग्नाचा एक फोटो शेअर केला. ज्याद्वारे त्यांने आपल्या लग्नाची बातमी चाहत्यांना दिली होती. मात्र, अलीने या फोटोमध्ये आपली पत्नी एलिसिया हिचा चेहरा दाखवला नव्हता. मात्र त्याने ५ जानेवारी रोजी लग्नाचा दुसरा फोटो शेअर केला होता, ज्यात तो आपली पत्नी एलिसियासोबत रोमँटिक मूड दिसला होता.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे जगातले सगळयात पॉवर कपल मानले जाते. आश्चर्याची बाब म्हणजे या दोघांची पहिली ओळख ही एका जाहिरातीच्या शूटवेळी झाली होती. मात्र त्या एका ऍडने दोघांचं आयुष्यच बदलून गेले. या दोघांची लव्ह स्टोरी ही प्रेक्षकांसाठी खूप खास होती. सर्वांनीच या जोडीला भरपूर पसंत केले. नंतर बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर २०१७ मध्ये दोघांनी इटलीच्या टस्कनी येथे लग्न केले होते. दोघांनीही आपल्या लग्नाची बातमी अतिशय गुप्त ठेवली. या लग्नात फक्त त्यांचे जवळचे लोकं उपस्थित होते. त्यांच्या लग्नानंतर, विराट आणि अनुष्काने सोशल मीडियावर प्रत्येक एक फोटो शेअर केला. ज्याद्वारे त्यांनी आपल्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची गुड न्यूज दिली. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले गेले होते.

सना शेख आणि अनस सय्यद

सना शेख हिने २०२० मध्ये बॉलिवूडला बाय बाय केले. तिचा हा निर्णय सर्वांना आश्चर्यचकित करणारा होता. यासोबतच सनाचा अजून एक निर्णय तिच्या फॅन्ससाठी सुखद धक्का ठरला. तिने २२ नोव्हेंबर २०२० रोजी तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला होता, तो फोटो तिच्या लग्नचा होता. या फोटोद्वारे सनाने सांगितले होते की, तिने अनस सय्यदसोबत लग्न केले आहे. आजच्या काळात, ती तिच्या पती अनससोबत सुखी वैवाहिक जीवन जगत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ऋतुजा लग्न करशील का माझ्याशी?’, अभिनेत्रीची सोज्वळता पाहून चाहत्याने ठेवला थेट लग्नाचा प्रस्ताव

-‘या’ दिवशी होणार झी मराठी पुरस्कार सोहळा साजरा, प्रिया मराठेने व्हिडिओ शेअर करून दाखवली डान्सची झलक

-सोनाली कुलकर्णीचा ‘शटर’ चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर

हे देखील वाचा