टॉलिवूड चित्रपटसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर येत आहे. बुधवारी (२४ मार्च) प्रसिद्ध तमिळ अभिनेता विरुत्छगाकांतचा मृतदेह चेन्नईमधील एका रिक्षामध्ये सापडला आहे. दीर्घ काळापासून चित्रपटसृष्टीत आपले स्थान बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अभिनेत्याच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला असून चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. असे म्हटले जात आहे की, झोपेतच अभिनेत्याने या जगाचा निरोप घेतला आहे. तरीही, अद्याप त्याच्या निधनाचे कारण अस्पष्ट आहे.
विरुत्छगाकांत दीर्घ काळापासून आर्थिक संकटाचा सामना करत होता. माध्यमांतील वृत्तानुसार, अभिनेता आपल्या आई-वडिलांच्या निधनानंतर खूपच चिंतेत होता. यानंतर त्याच्यावरील संकटामध्ये वाढ झाली आणि चित्रपटात काम मिळणेही कठीण झाले. इतकेच नाही, तर असे वृत्त आहे की, अभिनेत्याला पैसे नसल्यामुळे रस्त्याच्या कडेला रिक्षामध्येच झोपावे लागत होते. अनेक वेळा तर त्याने मंदिरामध्येही रात्र घालवली होती.
यानंतर तो आर्थिक आणि शारीरिकरीत्या खूपच कमजोर झाला होता. माध्यमांतील वृत्तानुसार, काही वर्षांपूर्वी दिग्दर्शक साई धीना यांनी अभिनेत्याची मदत केली होती. त्यांनी एका मंदिरामध्येच भेट घेतली होती आणि त्याची परिस्थिती पाहून त्याला आपल्या घरी बोलावले होते.
त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत अभिनेत्याला चित्रपटात काम मिळण्यासाठी विनंती केली होती. तरीही, त्यांच्या विनंतीकडे कुणीही लक्ष दिले नाही आणि या अभिनेत्याला काम मिळाले नाही.
विशेष म्हणजे, विरुत्छगाकांत सन २००४ मध्ये ‘काधल’ चित्रपटात दिसला होता. त्याने चित्रपटात संघर्ष करणाऱ्या अभिनेत्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याची भूमिका नक्कीच छोटी होती. परंतु त्याच्या डायलॉग्जने सर्वांच्या मनात घर केले होते. तरीही, या चित्रपटानंतर अभिनेत्याला कारकीर्दीत जो ब्रेक मिळाला, तो पुढे तसाच राहिला. तो कामाच्या निमित्ताने ठिकठिकाणी भटकत राहिला. आता त्याच्या निधनावर अनेक कलाकारा श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-माणुसकीचे उत्तम उदाहरण! मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतने दिले घुबडाला जीवनदान; सर्वत्र होतंय कौतुक
-भल्या भल्यांना रडवणाऱ्या कंगना रणौतला ‘या’ कारणामुळे अश्रू अनावर