Friday, July 5, 2024

रुबीना दिलैकचा ‘शक्ती-अस्तित्व के एहसास की’ शो लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप; कलाकार झाले भावुक

मनोरंजन विश्वातील अनेक मराठी तसेच हिंदी मालिकांनी प्रेक्षकांच्या हृदयात घर केले आहे. हिंदी मालिकेतील प्रसिद्ध असणारी ‘शक्ती- आस्तित्व के एहसास की’ या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. ३० मे २०१६ साली या मालिकेचा शुभारंभ झाला. या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. पण आता या मालिकेचे शूटिंग शनिवारी (१७सप्टेंबर) थांबवण्यात आले आहे. म्हणजेच आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. यातील कलाकारांनी प्रचंड सुंदर अभिनय करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

सिझेन खान, काम्या पंजाबी आणि रुबीना दिलैकसारख्या कलाकारांनी या मालिकेतून लोकप्रियेतेची शिखरे गाठली. मालिका संपल्यानंतर कलाकारांसह प्रेक्षकही नाराज झाले आहेत. माध्यमातील वृत्तानुसार, या मालिकेचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. इथून पुढे या मालिकेतील पुढील भागांसाठी एकही एपिसोड शूट केला जाणार नाही अशी माहिती समोर आली आहे. तर या मालिकेचे दुसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, यावर अद्यापही कोणती माहिती समोर आलेली नाही. शेवटच्या एपिसोडचे शूटिंग करताना सर्वच कलाकार भावूक झाले होते.

माध्यमांशी बोलताना सुत्रांनी पुढे सांगितले की, “त्यांना माहित होते की, मालिकेचा शेवट जवळ आला आहे. परंतु जेव्हा एखादी मालिका खरोखर निरोप घेते तेव्हा होणारे दुःख वेगळेच असते.” असे म्हटले जात आहे की, मालिकेचा शेवटचा भाग ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात प्रसारित होईल. या मालिकेऐवजी सलमान खानचा शो ‘बिग बॉस १५’ दाखवला जाईल. जर या शोचे शूटिंग तोपर्यंत पूर्ण नाही झाले, तर एखादा जुना शो दाखवला जाईल.

सलमान खानविषयी बोलायच झाले, तर तो सध्या ऑस्ट्रियामध्ये कॅटरिना कैफसोबत ‘टायगर ३’ चे शूटिंग करत आहे. या महिन्याच्या अखेरीस तो मुंबईला परतण्याची शक्यता आहे. या शोच्या समाप्तीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. शोची निर्माती रजनी शर्मा यांनी स्पष्टपणे सर्वांना गप्प राहण्यास सांगितले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बोले तो एकदम कडक!’ अरशद वारसीचे ‘बॉडी ट्रान्सफॉर्मेशन’ पाहून थेट जॉन सीनाशी केली जातेय तुलना

-‘बिग बॉस १५’साठी सलमान खान घेतोय ‘इतकी’ रक्कम; कोटीच्या मानधनामुळे अभिनेता आला ट्रोलर्सच्या निशाण्यावर

-भारीच ना! निशांत अन् शमिताला धूळ चाखवत दिव्या ठरली ‘बिग बॉस ओटीटी’ची उपविजेती

हे देखील वाचा