Sunday, June 22, 2025
Home बॉलीवूड आम्ही दोघेही पटकन माफी मागून घेतो; राजकुमार रावने सांगितला यशस्वी संसाराचा मंत्र…

आम्ही दोघेही पटकन माफी मागून घेतो; राजकुमार रावने सांगितला यशस्वी संसाराचा मंत्र…

राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी सुमारे ११ वर्षे एकमेकांना डेट केले, दोघांनी २०२१ मध्ये लग्न केले. लग्नाच्या पाच वर्षांत राजकुमार रावने कधी चूक केली आहे का? किंवा काही चूक झाली आहे का? याबद्दल अभिनेत्याला विचारले असता, त्याचे उत्तर काय होते, जाणून घ्या.

राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांनी अलिकडेच वीरेंद्र चावल यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, ‘आम्ही दोघेही चुका करतो. जेव्हा जेव्हा पत्रलेखा आणि मी भांडतो तेव्हा आम्ही एकमेकांपासून जास्त काळ दूर राहू शकत नाही. आम्ही लगेच एकमेकांना सॉरी म्हणतो. जो कोणी चूक करतो तो आधी सॉरी म्हणतो. सत्य हे आहे की आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही.’

पुढे राजकुमार राव म्हणतात, ‘चुकीचा प्रश्न आहे, तो आजपर्यंत झालेला नाही. मी किंवा पत्रलेखा दोघांनीही चूक केलेली नाही.’ यानंतर राजकुमार राव हसायला लागतो. राजकुमारचे बोलणे ऐकून वामिका देखील हसायला लागते

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

भारतात स्क्रीन्स खूप कमी आहेत, अनेकांना सिनेमे बघता येत नाहीत; आमीर खानने केले तुलनात्मक विश्लेषण…

हे देखील वाचा