फेब्रुवारी महिना जोडप्यांसाठी खूप खास असतो. या महिन्याला प्रेमाचा महिनाही म्हणतात. कारण फेब्रुवारीमध्ये व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी लोक एकमेकांवर प्रेम व्यक्त करतात आणि एकमेकांना साथ देण्याचे वचन देतात. ७ फेब्रुवारीपासून सुरू होणारा व्हॅलेंटाईन वीक १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासोबत अनेकांना एकत्र आणतो. या दिवशी अनेकांची लग्नेही होतात. बॉलिवूडमध्ये अशी अनेक जोडपी आहेत, ज्यांनी १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी एकमेकांशी लग्न करून आयुष्यभर एकत्र राहण्याचे वचन दिले. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या बॉलिवूड जोडप्यांनी व्हॅलेंटाइन डेला लग्न केले आहे.
अरशद वारसी- मारिया गोरेट्टी
बॉलिवूड अभिनेता अरशद वारसी (Arshad Warsi) आणि मारिया गोरेट्टी (Maria Goretti) एका कॉलेज फेस्टिव्हलमध्ये भेटले होते. जिथे मारिया एक स्पर्धक होती आणि अरशद वारसी परीक्षक होता. अरशद वारसी आणि मारिया यांनी १४ फेब्रुवारी १९९९ रोजी लग्न केले आणि ते कायमचे एकमेकांचे बनले.
रुसलान मुमताज- निराली मेहता
बॉलिवूड अभिनेता रुसलान मुमताजनेही व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी निराली मेहतासोबत (Nirali Mehta) लग्न केले. दोघेही एका डान्स अकादमीमध्ये भेटले आणि एकमेकांना हृदय दिले. रुस्लान मुमताज आणि निराली मेहता यांनी एकमेकांना दीर्घकाळ डेट केल्यानंतर १४ फेब्रुवारी २०१४ रोजी लग्न केले. दोघेही एका मुलाचे पालक आहेत.
मंदिरा बेदी- राज कौशल
बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) आणि राज कौशल (Raj Kaushal) यांनीही याच दिवशी लग्न केले. एका ऑडिशन दरम्यान दोघे पहिल्यांदा भेटले होते. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले. राजचे गेल्या वर्षी निधन झाले. मंदिराने आज त्यांच्या २३ व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त स्वतःचा आणि राजच्या लग्नाचा एक फोटो शेअर केला आहे.
हेही वाचा –
- ‘रंग प्रेमाचा,’ म्हणत सोनाली कुलकर्णीने ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त केले खास फोटो शेअर
- ईशा गुप्ताने इंस्टा स्टोरीला लिहिले असे काही की, चाहतेही पडले विचारात
- जीवाची पर्वा न करता सुनील दत्त यांनी नर्गिस यांच्यासाठी मारली होती आगीत उडी, अशी सुरु झाली ही प्रेमकहाणी
हेही पाहा-