Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड अरुणाचल प्रदेशातील आगीत नुकसान झालेल्या लोकांसाठी धावून आले वरुण- नताशा, केली ‘इतक्या’ लाख रुपयांची मदत

अरुणाचल प्रदेशातील आगीत नुकसान झालेल्या लोकांसाठी धावून आले वरुण- नताशा, केली ‘इतक्या’ लाख रुपयांची मदत

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आजकाल हिमाचल प्रदेशामध्ये ‘भेडिया’ चित्रपटाची शूटिंग करत आहे. त्याच्यासोबत त्याची पत्नी नताशा देखील तिथे आहे. शूटिंग व्यतिरिक्त वरुण आणि नताशा हिमाचल प्रदेशातील अनेक ठिकाणांचा आनंद घेताना दिसत आहेत. मागच्या महिन्यात अरुणाचल प्रदेशातील तिराप जिल्ह्यामध्ये भीषण आग लागली होती. या आगीत तिथे जीवित आणि वित्तहानी झाली आहे. वरुण आणि नताशा यांनी नुकसान झालेल्या लोकांना मदत केली आहे. त्यांचे यादरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, वरुण आणि नताशा हे दोघेही पारंपारिक ड्रेसमध्येे दिसत आहेत. त्या दोघांनीही येथील रहिवाश्यांना एक लाख रुपयांची मदत केली आहे. सोबतच क्रिती सेनन आणि भेडिया चित्रपटाची संपूर्ण टीम फोटोमध्ये दिसत आहे.

याआधी जेव्हा वरुण धवन अरुणाचल प्रदेशात शूटिंगसाठी गेला होता, तेव्हा तेथील त्याचे चाहते खूपच खुश झाले होते. त्यांनी त्याच्या संपूर्ण गाडीला वेढा घातला होता, तेव्हा वरुण धवनला ती गर्दी कंट्रोल करता आली नव्हती. त्यामुळे त्याने त्याच्या गाडीवर उभे राहून सगळ्यांना विनंती केली होती. त्याने सगळ्यांना सांगितले होते की, “आम्ही येथे अजून खूप दिवस आहोत. चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली की, आपण सगळेजण निवांत भेटू आणि गप्पा मारू.”

वरुण धवन आणि क्रिती सेनन हे भेडिया चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहे. ते शूटिंगवरील अनेक मजेशीर फोटो आणि व्हिडिओ शेअर करून प्रेक्षकांना अपडेट देत असतात. त्याचा भेडिया हा एक हॉरर आणि कॉमेडी चित्रपट आहे. त्यांनी या आधी ‘दिलवाले’ या चित्रपटात काजोल आणि शाहरुख खानसोबत काम केले आहे. त्याचा हा चित्रपट कसा असणार आहे, याबाबत सगळे प्रेक्षक प्रतिक्षेत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘इंडियन आयडल १२’ चा भाग बनल्यामुळे गायिकेने साधला ‘सदाबहार’ अभिनेत्री रेखावर निशाना, तर अनु मलिकला म्हटले क्रूर

-बॉलिवूडला कोरोनाचं ग्रहण! आज पुन्हा एक प्रसिद्ध अभिनेत्री कोरोनाच्या विळख्यात; चाहते चिंतेत

-‘मूर्खपणा शिगेला पोहोचला आहे’, मास्क न लावल्यामुळे टीव्ही कलाकारांनी सुनावले कंगना रणौतला खडेबोल

हे देखील वाचा