Monday, July 1, 2024

हेमा मालिनी ४० वर्षात का भेटल्या नाही धर्मेंद्रच्या पहिल्या पत्नीला?

मंडळी धर्मेंद्र (dharmendra) आणि हेमा मालिनी (hema malini) यांचं नाव बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोड्यांमध्ये नेहमीच घेतलं जातं. तसं तर त्यांच्या रिलेशनशीपचे, लग्नाचे अनेक किस्से प्रसिद्धही आहेत. त्यांच्या लग्नासाठीही अनेक नाट्य घडले होते. पण अखेर दोघांनी लग्न केले आणि त्यांच्या संसाराला आता 40 वर्षांपेक्षाही जास्त काळ झाला आहे. पण मंडळी हे माहित आहे का की या4 दशकांमध्ये हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीला भेटलेल्याच नाही. 

पण मंडळी जरा धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लव्हस्टोरी आधी थोडक्यात जाणून घेऊ. तर झाले असे की धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी काही चित्रपट एकत्र केले होते. यादरम्यान या दोघांच्यात जवळीक वाढत गेली. धर्मेंद्र हेमा मालिनी यांच्या सौंदर्यावर भाळले होते. हेमा मालिनी यांनी सुरुवातीला धर्मेंद्र यांचं प्रेम काही पटकन स्विकारलं नव्हतं, कारण धर्मेंद्र यांचं आधीच प्रकाश कौर यांच्याशी 1954 साली लग्न झालेलं. धर्मेंद्र आणि प्रकाश यांना बॉबी, सनी, अजेता आणि विजेता अशी दोन मुलं आणि दोन मुलीही होत्या. पण म्हणतात ना प्रेम शेवटी प्रेमच असतं. तसंच काहीसं झालं आणि धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांचं मन जिंकलं. पण असं असतानाही हेमा मालिनी यांचं लग्न त्यांच्या आई-वडिलांनी जितेंद्र यांच्याशी ठरवलेलं, असं म्हटलं जातं. पण धर्मेंद्र यांनी हेमा आणि जितेंद्र यांच्या ऐन लग्नात राडा घातला. मग काय लग्न तुटणारच होतं. पण आता प्रश्न होता धर्मेंद्र आणि हेमा यांच्या लग्नाचा धर्मेंद्र यांना त्यांची पहिली पत्नी प्रकाश यांना सोडायचे पण नव्हते. अखेर अनेक कॉम्प्रोमाइज झाल्यानंतर धर्मेंद्र आणि हेमा यांचं 1980 मध्ये लग्न झालं. पुढे त्यांना इशा आणि अहाना या मुलीही झाल्या.

मात्र इतक्या वर्षात धर्मेंद्र यांचे दोन्ही कुटुंब वेगवेगळे राहिले, जवळपासच्या एरियात राहुनही ते कधीही एकमेकांना फार भेटले नाही. असं असलं तरी धर्मेंद्र यांनी वडील म्हणून त्यांच्या मुलांना खूप प्रेम दिलं. हेमा यांना अनेकदा विचारण्यातही आलं की त्या प्रकाश यांना भेटल्या आहेत का. या प्रश्नाचं उत्तर देताना हेमा यांनी सांगितलेलं की त्यांना असं वाटत नाही की त्यांच्यामुळे कोणालाही त्रास व्हावा. त्याचमुळे त्या कधीही प्रकाश यांना भेटल्या नाहीत. त्यांनी असंही सांगितलेलं की धर्मेंद्र त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मुलींसाठी जे काही करतात, त्यात त्या खूश आहेत. ते वडीलांची भूमिका जशी निभवयाला हवी तशीच निभावतात. इतकंच नाही तर त्यांनी सांगितलेलं की हे त्यांचे वैयक्तिक आयुष्य आहे, त्यामुळे त्याबद्दल कोणी बोलू शकत नाही.

इतकंच नाही, तर जेव्हा धर्मेंद्र आणि हेमा यांचं लग्न झालेलं तेव्हा त्यांच्यावर टीकाही खूप झालेली. पण असं असतानाही प्रकाश यांनी प्रसिद्धीपासून दूर राहणंच पसंत केलेलं. त्यांनी धर्मेंद्र यांच्या बाजूने उभे राहात एकदा असंही म्हटलेलं की धर्मेंद्र भलेही चांगले पती बनले नाहीत, पण ते चांगले वडील नक्की आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चक्क ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनींना विंचरावे लागले होते शाहरुख खानचे केस, किंग खानने सांगितला रंजक किस्सा
राज कपूरांनी संधी देऊनही मागच्या दारातून हेमा मालिनीने ठोकली होती धूम! तरीही सिनेमा ठरला सुपरहिट

हे देखील वाचा