Wednesday, July 3, 2024

रणबीर आणि कॅटरिनाच्या ब्रेकअपवर नीतू कपूर यांनी केला होता धक्कादायक खुलासा, म्हणाल्या…

हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) प्रेम प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. आलिया आणि रणबीर कपूर गेले अनेक महिने रिलेशनशीपमध्ये आहेत. समोर आलेल्या बातमीनुसार, दोघे या वर्षी लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचेही समजले आहे. मात्र त्याआधी रणबीर कपूरची आई नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी रणबीर आणि कॅटरिना कैफच्या प्रेम प्रकरणाबद्दल केलेले एक धक्कादायक वक्तव्याबद्दल आज जाणून घेणार आहोत.

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर सध्या आलिया भट्टसोबत असलेल्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत आहे. दोघेही अनेकवेळा एखत्र फिरताना दिसले आहेत. दोघांनीही आपल्या नात्याबद्दल नेहमीच माध्यमांना आणि त्यांच्या चाहत्यांना माहिती दिली आहे. आता रणबीर आणि आलिया कधी लग्न बंधनात अडकतात याचीच त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. मात्र रणबीर कपूर याआधीही हिंदी चित्रपट क्षेत्रातील आघाडीच्या अभिनेत्रींसोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्याची ही प्रेम प्रकरणे सुद्धा चांगलीच गाजली. मात्र यामधील कोणतेही नाते लग्नापर्यंत जाऊ शकले नाही.

हिंदी चित्रपटसृष्टीत रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांच्या प्रेम प्रकरणाची सर्वात जास्त चर्चा झाली होती. २००८ मध्ये आलेल्या ‘बचना ए हसिनो’ चित्रपटादरम्यान दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली होती. दोघेही अनेकदा सोबत फिरताना दिसले होते. मात्र काही काळाने त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. ज्यामुळे दोघांचे नाते संपुष्टात आले. मात्र या प्रेम प्रकरणात दीपिका पदुकोणला प्रचंड त्रास झाल्याचे तिने सांगितले होते. यावेळी रणबीर कपूरने दीपिका पदुकोणला धोका दिला होता, ज्यामुळे दीपिका खूपच दुखावली होती. दीपिका नंतर रणबीर कपूरच्या आयुष्यात अभिनेत्री कॅटरिना कैफ (Katrina Kaif) आली. या दोघांचीही लवस्टोरी त्या काळात खूप गाजली. दोघे लिव्हइनमध्ये राहत असल्याच्या बातम्या ही समोर आल्या होत्या. मात्र रणबीरचे हे नातेसुद्धा फार काळ टिकू शकले नाही. शेवटी दोघांनी दूर जाण्याचा निर्णय घेतला.

समोर आलेल्या बातमीनुसार, त्यावेळी रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांनी याबाबत एका मुलाखतीत बोलताना मोठा खुलासा केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, “त्याला कुणाचे मन दुखवू वाटत नाही आणि कुणाला नाही म्हणायला सुद्धा येत नाही. तो पहिल्यांदा प्रेमात पडला तेव्हाच मी त्याला या गोष्टींना जास्त गांभीर्याने घेऊ नकोस असे सांगितले होते. परंतु त्याने ऐकले नाही.” नीतू कपूर यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा झाली होती. आता दीपिका आणि कॅटरिना दोघीही आपल्या वैवाहिक आयुष्यात व्यस्त असून दीपिकाने रणवीर सिंगसोबत तर नुकताच कॅटरिनाने विकी कौशलसोबत विवाह केला आहे.

हेही वाचा –

हे देखील वाचा