अभिनेत्री सुष्मिता सेन हिचा भाऊ राजीव सेन याने टीव्ही अभिनेत्री चारु असोपासोबत 2019 मध्ये विवाह केला होता. त्यांना दोन वर्षाची एक लहान मुलगीही आहे. हे दोघेही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्यांच्या फोटो आणि व्हिडिओला चाहत्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असतो. मात्र, काही दिवसांपासून या जोडप्याचे नाते एका तुटत आलेल्या धाग्यासारखे झाले होते, त्यामुळे या जोडप्याच्या चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. चला तर नेमकं झाले काय हे जाणून घेऊया.
टीव्ही अभिनेत्री चारु असोपा (Charu Asopa) आणि ‘मिस युनिव्हर्स’ असलेली अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) हिचा भाऊ राजीव सेन (Rajeev Sen) हे दोघे एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत होते. त्यांनी आपल्या नात्याचे लग्नात रुपांतर केले आणि त्यांना एक मुलगीही आहे. त्यांचे एकदम परिपूर्ण कुटुंब होते. मात्र, त्यांच्ये नाते वादाने घेरले होते. या दोघांमध्ये एक वर्षातच वादविवाद होऊ लागले आणि एकदा तर मीडियासमोरच त्यांच्या वादाला सुरुवात झाली होती. ते दोघेही सोशल मीडियाद्वारे एकमेकांवर टीका करू लागले. लॉकडाऊनमध्ये हे दोघे वेगवेगळे राहू लागले होते. आपल्या मुलीची आठवण काढत राजीवने सोशल मीडियावर भावूक होऊन काही पोस्टही शेअर केल्या होत्या. चारु आणि राजीवने सनसूधही वेगवेगळे राहूनच साजरे केले होते. त्यांचा वाद त्यांना घचस्फोटाच्या टोकाच्या निर्णयापर्यंत घेऊन पोहोचला होता.
घटस्फाटापर्यंत पोहोचल्यावर या जोडप्याला आपल्या नात्याची जाणीव झाली आणि या लग्नाला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. राजीव आणि चारु या जोडप्याने आपला ब्लॉग तयार करून सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना खुशखबर दिली आहे की, “आम्ही पुन्हा एकदा एकत्र राहणार आहोत, आणि आमच्या लग्नाला आजून एक संधी देणार आहोत. आम्ही घटस्फोट घेण्याचा निर्णय बदलला आहे.”
View this post on Instagram
चारु असोपाने आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या नात्याबद्दल खुलासा केला आहे की, तिला कोणाकडून प्रेरणा मिळाली आणि तिच्या खडतर दिवसात चाहत्यांनी तिला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहे. चारुने पुढे सांगितले आहे की, ती भेलवाडमध्ये राहत असताना तिने ठरवले होते की, ती मुंबईला गेल्यावर आपली मुलगी जियासोबत नवीन आयुष्याची सुरुवात करेल.
अभिनेत्री चारु असोपा हिला देवी- देवतांवर खूप विश्वास आहे. ती आपल्यासोबत घडलेल्या घटनेला आणि तिने घेतलेल्या निर्णयाला देवी- देवतांना श्रेय देते. कोर्टाच्या तारखेच्या एक रात्री अगोदर काय झाले, याचा खुलासा करत तिने सांगितले की, ती 29 ऑगस्टला मुंबईला पोहोचली होती. तिला आणि राजीवला 30 ऑगस्टला कौटुंबिक न्यायालयामध्ये पोहोचायचे होते.
त्या रात्री चारु आणि राजीव एकत्र भेटले आणि खूप वेळ एकमेकांशी संवाद साधला. तसेच, झालेले वाद- गैरसमज समजून घेतले आणि आपल्यामधील वाद मिटवले. चारुने पुढे सांगितले की, कदाचित “बाप्पालाच वाटत होती की, आमची मुलगी जियाना हिच्यासाठी तरी आम्ही आमच्या नात्याला एक संधी दिली पाहिजे.” यानंतर दोघांनीही आपली मुलगी जियानासोबत एक फॅमिली सेल्फी काढत सोशल मीडियावर शेअर करुन खुलासा केला की, “आम्ही पुन्हा एकदा सोबत राहणार आहोत.”
या जोडप्याला पुन्हा एकदा एकत्र पाहून त्यांचे चाहतेदेखील भलतेच खुश झाले आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
चाळीस रुपड्यांसाठी भर बाजारत ‘हर हर शंभू’ फेम गायिकेशी भांडला भाऊ, पण का भांडले भाऊ-बहीण?
‘कायदेशीर कारवाई करायचीये, पण…’, म्हणत गाणं रिमेक केल्याने नेहा कक्करवर भडकली फाल्गुनी पाठक
बिहारच्या लोकांकडून सोनूचे जंगी स्वागत, अभिनेत्यानेही घेतला प्रसिद्ध पदार्थाचा आस्वाद; व्हिडिओ व्हायरल