Wednesday, June 25, 2025
Home बॉलीवूड ऋषी कपूर करायचे राजेश खन्ना यांचा तिरस्कार; म्हणाले होते, ‘माझ्या हिरोईनला दूर केले आणि…’

ऋषी कपूर करायचे राजेश खन्ना यांचा तिरस्कार; म्हणाले होते, ‘माझ्या हिरोईनला दूर केले आणि…’

बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये एकाच मुलीवर दोन तरुण प्रेम करत आहेत, असे दाखवले जाते. परंतु बॉलिवूडमधील काही कलाकारांमध्ये खऱ्या आयुष्यात देखील असे किस्से घडले आहेत. बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या चित्रपटांचे आजही अनेक चाहते आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत केलेला अभिनय आजही त्यांचे चाहते आवर्जून पाहतात. सर्वगुण संपन्न असलेल्या या अभिनेत्याचा कुणाला राग येणे शक्यच नाही. परंतु बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार ऋषी कपूर राजेश खन्ना यांचा नेहमी तिरस्कार करायचे. याचे कारण देखील तितकेच मोठे आहे.

ऋषी कपूर यांचा ‘बॉबी’ हा बॉलिवूडमधील पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटामध्ये त्यांना सहकलाकार म्हणून डिंपल कपाडिया यांनी साथ दिली होती. डिंपल यांचा देखील हा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटावेळी राजेश खन्ना यांच्या अभिनयातील विमानाने आभाळ गाठलं होतं. ‘बॉबी’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानच त्यांची डिंपल यांच्या बरोबर मैत्री वाढली होती. ते दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले होते.

ऋषी कपूर यांनी पत्रकारांशी बातचीत करताना राजेश खन्ना यांच्या विषयीचा एक किस्सा सांगितला होता. यामध्ये राजेश खन्ना यांनी डिंपल यांच्या हातामधील अंगठी पाहून कशा पद्धतीने व्यवहार केला. तसेच ते कायम रागामध्ये त्यांच्याशी कसे बोलायचे. या विषयी ऋषी कपूर सांगत होते. तसेच त्यांनी यावेळी डिंपल यांचा देखील उल्लेख केला. नेमके कोणत्या कारणावरून ते राजेश खन्ना यांचा खूप राग राग करायचे हे देखील स्पष्ट केले.

अंगठी पाहून राजेश खन्ना यांना आला होता राग
ऋषी कपूर म्हणाले की ,”‘बॉबी’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी राजेश खन्ना जुहू चौपाटीवर एकदा डिंपल यांना भेटले होते, तेव्हा डिंपल यांच्या हातामध्ये एक अंगठी होती ती पाहून राजेश खन्ना खूप भडकले. त्यांनी ती अंगठी लांब पाण्यामध्ये फेकून दिली. त्यामुळे त्यांचे हे वागणे मला अजिबात आवडले नव्हते. मी हे डिंपल यांना देखील सांगितले.”

ऋषी कपूर यांची होती ती अंगठी
मुलाखतीमध्ये पुढे त्यांनी अंगठीबाबत खुलासा करत सांगितले की, “ती अंगठी माझी होती. मला ती एका मुलीने दिली होते. मी आजही ती अंगठी शोधण्यासाठी जुहू किनारपट्टीवर जातो. सेटवर शूटिंगवेळी ती अंगठी माझ्या बोटांमध्ये डिंपल यांनी पहिली होती. त्यांना ती आवडली त्यामुळे त्यांनी स्वतःच माझ्याकडून अंगठी घेतली आणि स्वतःच्या हातामध्ये घातली. काकांनी माझ्या हिरोईनला माझ्यापासून दूर केले आणि तिच्याबरोबर लग्न देखील केले. म्हणून मला त्यांचा खूप राग येतो, पण याही पेक्षा मोठं कारण म्हणजे मला एका मुलीने दिलेली अंगठी त्यांनी फेकली म्हणून मला त्यांच्याविषयी खूप जास्त राग होता. तसेच काकांवर रागवण्यासाठी माझ्याकडे खूप कारणं आहेत.”

राजेश खन्ना यांनी माफी देखील मागितली नव्हती
राजेश खन्ना यांनी या विषयी ऋषी कपूर यांची कधीच माफी मागितली नाही. त्यामुळे ऋषी कपूर यांना आणखीनच वाईट वाटले. मुलाखतीमध्ये त्यांनी आणखीन एक गोष्ट सांगितली ते म्हणाले होते की, “डिंपल माझा जीव घेईल.” ती अंगठी आजही का शोधता असे विचारल्यावर ते म्हणाले की, “आजही मी ती अंगठी शोधतो कारण आता आमच्यामध्ये काकाजी नाही राहिले, माझे हे बोलणे ऐकले, तर डिंपल माझा जीव घेईल.”

राजेश खन्ना यांनी अंगठी, तर फेकलीच होती त्याचबरोबर त्यांनी ‘बॉबी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये अनेक अडथळे देखील आणले होते. या चुकीमुळे आणि अशा वागणुकीमुळे ऋषी कपूर त्यांचा खूप राग राग करायचे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे ट्विटर अकाऊंट कायमचे बंद, ‘ही’ आहे शेवटची पोस्ट

-अरबाजने अनिल यांना विचारला सलमानच्या लग्नाचा प्रश्न; अभिनेते म्हणाले, ‘तू तर त्याचा भाऊ आहेस…’

-आमिर खानच्या बॉडीगार्डचा पगार ऐकाल, तर मोठमोठ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचा पगार नक्कीच विसराल

हे देखील वाचा