अभिनेता आमिर खान (Aamir Khan) सध्या त्याच्या लालसिंग चड्ढा चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. चार वर्षानंतर आमिर खान मोठ्या प्रमाणावर पुनरागमन करणार आहे.त्यामुळे आमिर खानच्या चाहत्यांनाही या चित्रपटाची चांगलीच उत्सुकता लागली आहे. चित्रपट ११ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याआधी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरुन बॉयकॉट करण्याची मागणी करण्यात आली होती. याबद्दलच अभिनेता आमिर खानने मोठे वक्तव्य केले आहे.
सोशल मीडियावर ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ या ट्रेंडबद्दल मीडियाने आमिर खानला प्रश्न विचारला असता, अभिनेता म्हणाला, “जेव्हा लोक बॉलीवूड आणि लाल सिंग चड्ढावर बहिष्कार टाकण्याबद्दल बोलतात तेव्हा मला खूप वाईट वाटते. खासकरून जेव्हा लोक माझ्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्याची मागणी करतात कारण ते असा विचार करतात की की ज्यांना भारत आवडत नाही अशा लोकांच्या यादीत मी आहे. पण ते खरे नाही. काही लोकांना असे करणे आवडते हे दुर्दैवी आहे. कृपया माझ्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नका. कृपया माझा चित्रपट पहा.”
तत्पुर्वी 2015 मध्ये आमिर खान एका कथित टिप्पणीमुळे चर्चेत आला होता. “आपला देश खूप सहिष्णू आहे, परंतु काही लोक दुष्टपणा पसरवत आहेत,” अशी प्रतिक्रिया आमीर खानने दिली होती. एवढेच नाही तर आमिर खानची पत्नी आणि चित्रपट निर्माती किरण राव हिने सांगितले होते की, ती आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी देश सोडण्याचा विचार करत आहे. या जुन्या विधानामुळे नेटिझन्स त्यांना हिंदुविरोधी आणि भारतविरोधी म्हणत आहेत.
लाल सिंग चड्ढा बद्दल बोलायचे तर टॉम हँक्स अभिनीत हा हॉलीवूड चित्रपट फॉरेस्ट गंपचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित या चित्रपटात करीना कपूर खान आणि मोना सिंग यांच्याही भूमिका आहेत. साऊथ अभिनेता नागा चैतन्यचा हा बॉलिवूड डेब्यू आहे. लाल सिंग चड्ढा याआधी बैसाखीच्या रिलीजसाठी नियोजित होते, परंतु निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 11 ऑगस्ट 2022 पर्यंत पुढे ढकलली.
हेही वाचा –
जीवे मारण्याच्या धमक्यांनंतर सलमान खानला मिळाली शस्त्र परवाना बाळगण्याची परवानगी
ब्रेकिंग! ‘या’ प्रसिद्ध गायिकेचे निधन, कुटुंबियांंनी केली हळहळ व्यक्त