Thursday, June 12, 2025
Home बॉलीवूड नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्यानंतर समंथाचे करिअरवर लक्ष; हिंदी चित्रपटाव्यतिरिक्त साईन केले अनेक प्रोजेक्ट्स

नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्यानंतर समंथाचे करिअरवर लक्ष; हिंदी चित्रपटाव्यतिरिक्त साईन केले अनेक प्रोजेक्ट्स

अभिनेता नागा चैतन्य अक्किनेनीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर चर्चेत असलेली अभिनेत्री समंथा रूथ प्रभूने आता तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, समंथा आजकाल अनेक प्रोजेक्ट्स साईन करण्यात व्यस्त आहे. ती ‘शकुंतलम’ या आगामी तेलुगु चित्रपटात झळकणार आहे.

समंथाने तिचा हिंदी प्रोजेक्टही साईन केला आहे. ज्याची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे. ‘फॅमिली मॅन २’ या वेबसीरिजमध्ये राजीच्या भूमिकेत समंथाने दिलेल्या परफॉर्मन्सनंतर, तिला बॉलिवूडमधून ऑफर्स येत आहे. समंथा देखील अनेक प्रोजेक्टमध्ये स्वारस्य दाखवत आहे. त्यामुळे तिने मुंबईत घरही खरेदी केले आहे. ती बॉलिवूडमधील चित्रपट निर्मात्यांना सतत भेटत असते आणि यामुळे तिला हैदराबादहून मुंबईला पुन्हा पुन्हा येण्यास त्रास होतो. त्यामुळे घर खरेदी केल्यानंतर समंथा काही काळ मुंबईतच राहणार आहे.

शकुंतलम’मध्ये दिसणार समंथा
समंथा आगामी चित्रपटात ‘शकुंतला’च्या भूमिकेत दिसणार असून, हा चित्रपट कालिदासच्या प्रसिद्ध ‘शकुंतला’ नाटकावर आधारित आहे. गुणशेखर हे या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. अलीकडेच, गुणशेखर यांची मुलगी नीलिमाने खुलासा केला होता की, समंथाला चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली, पण ती साईन करण्यास संकोचत होती. कारण ती गेल्या वर्षी नागा चैतन्यसोबत फॅमिली प्लॅनिंग करत होती.

नीलिमा म्हणाली होती की, “तिला आई व्हायचे होते, तिने मला सांगितले की, ही तिची प्राधान्य आहे. पीरियड चित्रपट बनण्यास वेळ लागतो आणि यामुळे ती साईन करण्यास संकोच करत होती, पण आम्ही तिला सांगितले की, एक्स्टेंसिव प्री-प्रोडक्शनचे काम आधीच केले गेले आहे, त्यामुळे बराच वेळ वाचेल. हे ऐकून ती आनंदी झाली आणि ऑन-बोर्ड येण्यास तयार झाली.”

२ ऑक्टोबर रोजी घटस्फोटाची घोषणा केली
समंथाने २ ऑक्टोबर रोजी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिले की, “बऱ्याच विचारविनिमयानंतर मी आणि नागा यांनी पती- पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघे खूप भाग्यवान आहोत की, मैत्री हा एक दशकाहून अधिक काळ आमच्या नात्याचा मुख्य भाग होता, आम्हाला खात्री आहे की, आमच्यामध्ये एक खास बंधन राहील.”

https://www.instagram.com/p/CUhawZvrPK9/?utm_source=ig_web_copy_link

समंथा आणि चैतन्यने २०१७ मध्ये धूमधडाक्यात लग्न केले होते. अलीकडेच, दोघांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर करून ४ वर्षांचे नाते तोडल्याची बातमी शेअर केली होती. दोघांच्या या निर्णयामुळे चाहते निराश झाले आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-इंग्रजीवरून आणि बॉडीशेमिंगवरून ट्रोल झालेली मोनालिसा नेहमीच करते ट्रोलर्सकडे दुर्लक्ष

-भावाच्या अटकेनंतर सुहाना खान पडली आजारी, शाहरुख- गौरीकडून सतत घेतेय अपडेट

-आर्यन खानची रात्र कारागृहातच; सत्र न्यायालयाकडून फेटाळण्यात आला जामीन

हे देखील वाचा