टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध आणि वादग्रस्त शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बिग बॉस’चा प्रचंड मोठा प्रेक्षकवर्ग आहे. या शोचे आता १५ वे पर्व काही दिवसात सुरू होणार आहे. मात्र, दुसरीकडे ‘बिग बॉस ओटीटी’ या शोला त्यांचा पहिला विजेता मिळाला आहे. सर्व प्रेक्षकांना प्रतीक्षा होती की, ‘बिग बॉस ओटीटी’चा पहिला विजेता बनण्याचा मान कोणत्या स्पर्धकाला मिळेल. मात्र, प्रेक्षकांच्या प्रतीक्षेला पूर्ण विराम लागला आहे. सर्व स्पर्धकांना मागे टाक दिव्या अग्रवालने विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. या शोच्या फिनालेमध्ये दिव्यासोबत निशांत भट्ट, राकेश बापट, शमिता शेट्टी आणि प्रतीक सहजपाल यांचाही समावेश होता. मात्र, सर्वांना पछाडत ‘बिग बॉस ओटीटी’चा किताब पटकावल्याने दिव्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
दिव्याने ‘बिग बॉस ओटीटी’चा किताब पटकावल्यानंतर तिचा बॉयफ्रेंड वरुण सूद भलताच खुश झाल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, नुकताच तो आपली गर्लफ्रेंड दिव्याला भेटण्यासाठी थेट बिग बॉसच्या घरातही गेला होता. यादरम्यान त्याला पाहून दिव्या भावुक झाली होती. विजेतेपद पटकावून दिव्या घरी येण्याच्या आनंदात वरुणने तिचे खास अंदाजात स्वागत केले होते. (Actor Varun Sood Celebrate Divya Agarwal’s Win In Bigg Boss OTT)
दिव्या घरी पोहोचताच वरुण आणि त्याच्या मित्रमंडळींनी दिव्याचे जबरदस्त स्वागत केले. हा दिवस कायम लक्षात राहावा यासाठी त्यांनी एकत्र केकही कापला आणि खास क्षणाचा आनंद घेतला. वरुणने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवरही एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्याने “मला तुझा अभिमान आहे,” असे म्हटले होते. यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांचा हा व्हिडिओ चाहत्यांना भलताच आवडला आहे.
https://www.instagram.com/p/CT_X4M_qhtz/?utm_source=ig_web_copy_link
दिव्या आणि वरुण हे जोडपं मागील बऱ्याच काळापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे.
जेव्हा सुरू झाली वरुण आणि दिव्याची लव्हस्टोरी
‘एस ऑफ स्पेस’ या रियॅलिटी शोमधून वरुण आणि दिव्याची लव्हस्टोरी सुरू झाली होती. यादरम्यानच वरुण दिव्याला पाहताक्षणीच प्रेमात पडला होता. ते एकमेकांसोबत अधिकाधिक वेळ घालवत होते. यानंतर त्यांनी एकमेकांना डेट करण्याचा निर्णय घेतला होता.
‘हे’ स्वप्न पूर्ण झालं की करणार लग्न
खरं तर, वरुण आणि दिव्याला सर्वप्रथम मुंबईत आपले स्वत:चे एक सुंदर घर विकत घ्यायचे आहे. घराचे स्वप्न पूर्ण होताच, ते दोघेही लग्नाच्या पवित्र बंधनात अडकणार आहेत. कारण त्यानंतर ते आपल्या कुटुंबाला वाढवण्याची योजना बनवतील. वरुण आणि दिव्या पुढील वर्षापर्यंत घर विकत घेण्याची योजना बनवत आहेत.
केव्हा झाली होती ‘बिग बॉस ओटीटी’ला सुरुवात?
‘बिग बॉस ओटीटी’ हा शो ८ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता सुरू झाला होता. हा शो करण जोहरने होस्ट केला होता. ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये एकूण १३ स्पर्धक झळकले होते. त्यामध्ये राकेश बापट, झीशान खान, प्रतीक सहजपाल, करण नाथ, शमिता शेट्टी, उर्फी जावेद, मिलिंद गाबा, निशांत भट्ट, नेहा भसीन, मूस जटाना, अक्षरा सिंग, दिव्या अग्रवाल आणि रिद्धिमा पंडित यांचा समावेश होता.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-राखी सावंतला पती रितेशचा पाठिंबा, राघव चड्ढांच्या ‘या’ विधानावर घेतली त्यांची शाळा
-बाकीच्या पर्वांपेक्षा खास आहे हे पर्व; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसं बघू शकाल सलमानचा ‘बिग बॉस’
-फोटो शेअर करून चाहत्यांना ‘फिटनेस गोल’ देतेय जान्हवी कपूर; वर्कआउट पाहून तुम्हीही कराल कौतुक