Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड सहा वर्षेही नाही टिकलं ‘या’ अभिनेत्रीचं लग्न, उत्तम कारकीर्द असूनही मिळाली नाही ओळख

सहा वर्षेही नाही टिकलं ‘या’ अभिनेत्रीचं लग्न, उत्तम कारकीर्द असूनही मिळाली नाही ओळख

हिंदी चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांच्या चित्रपटांपेक्षा इतर गोष्टींतच जास्त प्रसिद्धी मिळवली आहे. या मध्ये अभिनेत्री फराह नाजचा (Farah Naaz) प्रामुख्याने समावेश होतो. फराह नाज त्यांच्या चित्रपटांपेक्षा वैवाहिक आयुष्या मुळेच जास्त चर्चेत राहिली. जाणून घेऊ या तिच्याबद्दल.

अभिनेत्री फराह नाजने ८०-९०च्या दशकात आपल्या अभिनयाने जोरदार लोकप्रियता मिळवली होती. या क्षेत्रात त्यांनी २० वर्षे काम केले. मात्र अचानक त्या चित्रपटात दिसेनाश्या झाल्या. प्रसिद्ध अभिनेत्री तब्बुची मोठी बहीण असलेल्या फराहने ‘नसीब अपना अपना’, ‘यतीम’, ‘इमानदार’ ‘घर घर की कहानी’ अशा अनेक चित्रपटात काम केले. मात्र त्यांना अभिनयाने प्रेक्षकांना आकर्षित करता आले नाही. त्या आपल्या वैवाहिक जीवनात मात्र नेहमी चर्चेचा विषय ठरल्या.

समोर आलेल्या माहितीनुसार अभिनेत्री फराह नाझने दोन लग्न केली होती. त्यांचे पहिले लग्न फक्त सहाच वर्ष टिकले. त्यानंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. फराहने अभिनेता दारा सिंगचा मुलगा विंदू दारा सिंगसोबत पहिले लग्न केले. त्यांना एक मुलगाही झाला होता. मात्र त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याने त्यांनी घटस्फोट घेतला.

त्यानंतर फराहने अभिनेता सुमित सहगलसोबत दुसरे लग्न केले. हिंदी चित्रपट जगतात फराहची आदित्य पांचोलीसोबत घट्ट मैत्री होती. आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोलीच्या ‘सॅटेलाईट शंकर’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी त्या दिसल्या होत्या. यावेळी त्यांना ओळखणे सुद्धा कठीण झाले होते.

फराहची आणखी एक खासियत म्हणजे त्या खूप भांडखोर होत्या. यश चोप्रा यांची पत्नी पामेलासोबत त्यांचा वाद चांगलाच चर्चेत आला होता. फराहने यश चोप्रा यांच्याच ‘फासले’ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.

 

हेही वाचा- 

हेही पाहा-

हे देखील वाचा