Saturday, July 27, 2024

Kangana चे किस्से | आधी अनिल देशमुख नंतर थेट उद्धव ठाकरे; आख्ख्या सरकारला नडली होती कंगना

बॉलिवूडमध्ये ‘पंगा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेचा विषय बनत असते. अभिनेत्री प्रत्येक मुद्द्यावर आपले मत निर्दोषपणे व्यक्त करते. याच स्टाईलमुळे ती सतत चर्चेत असते. या सगळ्याशिवाय अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. त्याचबरोबर कंगनाच आणि वादाच नात किती जवळच आहे हे कोणाला सांगण्याची गरजच नाही. तिने भल्याभल्यांना आपल्या वादग्रस्त विधांनानी गप्प केले आहे. तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनिल देशमुख, संजय राऊत यांनाही सोडले नाही. कंगना रणौत गुरुवारी (23 मार्च) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर मग जाणून घेऊया कंगना या मंत्र्यांबद्दल काय बोलली आहे ज्यामुळे ती वादात सापडली होती.

उद्धव ठाकरे
कंगनाने (Kangana Ranaut) उद्धव ठाकरे यांच्याबद्दल देखील वादग्रस्त विधान केले होते. ती म्हणाली की, “उद्धव ठाकरे, माफिया चित्रपटातून तुम्ही माझे घर तोडून माझा मोठा बदला घेतला आहे. मला वाटते की तुम्ही माझ्यावर खूप मोठा उपकार केला आहे. काश्मिरी पंडितांचे काय झाले असेल हे मला माहीत होते. आज मला ते जाणवले. आज मी या देशाला वचन देते की, मी केवळ अयोध्येवरच नाही, तर काश्मीरवरही चित्रपट बनवणार आहे आणि माझ्या देशवासियांना जागे करीन कारण मला माहित होते की, हे आपल्यासोबत घडणार आहे पण माझ्या बाबतीत घडले आहे. त्याचा काही अर्थ आहे, काही अर्थ आहे. उद्धव ठाकरे माझ्यासोबत हे क्रौर्य घडले हे चांगले आहे कारण त्याचा काही अर्थ आहे… जय हिंद, जय महाराष्ट्र.”

अनिल देशमुख
कंगनाच्या एका चाहत्याने अभिनेत्रीचा सप्टेंबर 2020 चा व्हिडिओ ट्वीट केला आहे. हा व्हिडिओ त्यावेळचा आहे जेव्हा बीएमसीने अभिनेत्रीच्या मुंबईतील घराची तोडफोड केली होती. यानंतर कंगनाने व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार आणि अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला होता.

कंगनाने निशाणा साधताना लिहिले आहे की, “जो साधूंना मारतो आणि महिलांचा अपमान करतो तो नक्कीच पडेल #AnilDesmukh ही तर सुरुवात आहे, पुढे बघा काय होते #UddhavThackeray.”

संजय राऊत
कंगना रणौतने मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केल्याने अनेक बॉलिवूड स्टार्सनीही टीका केली. तिने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, “शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला उघडपणे धमकी दिली आहे आणि मला मुंबईत परत न जाण्यास सांगितले आहे. मुंबईच्या गल्लीबोळात आधी स्वातंत्र्याच्या घोषणा दिल्या आणि आता उघड धमक्या दिल्या जात आहेत. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का दिसते?” त्यानंतर अनिल देशमुख यांनी तर कंगनाला येथे राहण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर कंगनाने राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला होता.(actress kangana ranaut anil deshmukh uddhav thackeray sanjay raut argument)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
माधुरीने आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला वाढदिवस; म्हणाली, “निस्वार्थी निखळ मुलांमध्ये…”

‘मैत्रीत जाणीव पाहिजे आणि…’ सुनील शेट्टीने सलमान आणि त्याच्या नात्यावर भाष्य

हे देखील वाचा