Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड अर्जुन कपूर सोबत ब्रेक अप नंतर मलाईका म्हणते; त्यांना जपा जे तुमच्या दुःखात दुखी असतात आणि आनंदात आनंदी…

अर्जुन कपूर सोबत ब्रेक अप नंतर मलाईका म्हणते; त्यांना जपा जे तुमच्या दुःखात दुखी असतात आणि आनंदात आनंदी…

मलायका अरोरा तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत आहेत. जरी दोघांनीही अधिकृतपणे ब्रेकअपबद्दल बोलले नाही तरी. अर्जुन कपूरच्या वाढदिवसालाही मलायकाने सोशल मीडियावर त्याला शुभेच्छा दिल्या नाहीत.

रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर मलायका आणि अर्जुनचे काही महिन्यांपूर्वी ब्रेकअप झाले होते आणि तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये तिने आपण लोकांच्या लक्षात कसे असावे हे सांगितले आहे.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते पण आता दोघे वेगळे झाले आहेत. दोघेही अनेक महिन्यांपासून वेगळे दिसत आहेत. दोघे एकदाही एकत्र दिसले नाहीत.

मलायका अरोराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक कोट शेअर केला आहे. ज्यामध्ये लिहिलं आहे की, ‘नेहमी त्या लोकांकडे लक्ष द्या जे तुमच्या सुखात आनंदी आणि तुमच्या दु:खात दुःखी असतात. असे लोक तुमच्या हृदयात विशेष स्थान मिळवण्यास पात्र आहेत. मलायकाने या पोस्टमध्ये कोणाचाही उल्लेख केलेला नाही. तिच्या आणि अर्जुनच्या ब्रेकअपच्या बातम्या येत असताना तिने ही पोस्ट शेअर केली आहे.

अर्जुन कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीतही मलायका अरोरा दिसली नाही. अर्जुनच्या मिडनाईट बर्थडे पार्टीला त्याचे सर्व मित्र उपस्थित होते पण मलायका तिथे नव्हती. तसेच तिने  सोशल मीडियावर अर्जुनला शुभेच्छा दिल्या नाहीत. अर्जुन आणि मलायकाच्या ब्रेकअपची बातमी तेव्हा समोर आली जेव्हा दोघांनी एका इव्हेंटला हजेरी लावून एकमेकांकडे दुर्लक्ष केले.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची पुष्टी केली होती. त्यानंतर दोघेही अनेक दिवस त्यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत राहिले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

रणवीर दीपिकाच्या बाळासाठी राखी सावंतने दुबईत विकत घेतली खेळणी; चाहते म्हणतात राखीचे मन खूप मोठे आहे…

हे देखील वाचा