Wednesday, June 25, 2025
Home बॉलीवूड निक्कीच्या बॉयफ्रेंडमुळे घरच्यांनी केले होते तिचे कॉलेजला जाणे बंद; म्हणाली, ‘तो खूपच पझेसिव्ह होता…’

निक्कीच्या बॉयफ्रेंडमुळे घरच्यांनी केले होते तिचे कॉलेजला जाणे बंद; म्हणाली, ‘तो खूपच पझेसिव्ह होता…’

कलाकारांच्या आयुष्यात अनेक प्रेमप्रकरणे होताना दिसतात. अशात अनेक कलाकार आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहत नाहीत, तर काहीजण मरेपर्यंत आपले प्रेम टिकवतात. या सर्वांमध्ये प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात बालपणापासूनचे देखील अनेक किस्से असतात. अभिनेत्री निक्की तांबोळीच्या आयुष्यात देखील असा एक किस्सा आहे.

दाक्षिणात्य चित्रपटांतील अभिनेत्री निक्की तांबोळी ‘बिग बॉस १४’ मध्ये झळकली होती. या आधी तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु बिग बॉसच्या घरामध्ये आल्यानंतर ती घराघरात पोहोचली. त्यानंतर ती अनेक शो मध्ये झळकू लागली. ‘खतरों के खिलाडी ११’ मध्ये देखील ती दिसली होती.

कोरोना काळात तिच्या भावाचा मृत्यू झाला होता. परंतु काही दिवसांनी लगेचच ती खतरों के खिलाडीच्या शूटिंगसाठी बाहेर गावी गेली होती. या सर्वांमुळे तिला त्यावेळी खूप ट्रोल देखील केले होते.

नुकतीच तिने एका वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. यामध्ये तिने तिच्या आयुष्यातील प्रियकराविषयी एक खुलासा केला. ती म्हणाली की, “मी कॉलेजमध्ये असताना माझा एक बॉयफ्रेंड होता. तो माझ्याबाबत खूप पझेसिव्ह होता. त्यावेळी माझ्या घरी त्याच्याबद्दल समजले होते. त्यामुळे माझ्या घरच्यांनी माझे कॉलेजला जाणे बंद केले होते. मी अजूनही त्याच्याबरोबर ब्रेकअप केले नाही. तो माझ्या कॉलेजचा नव्हता, तरी देखील माझ्या घरच्यांना मी कॉलेजला जाणे मान्य नव्हते.”

अभिनेत्रीने आजवर काही तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये झळकली आहे. ‘कंचना ३’ मध्ये देखील तिने अभिनय केला आहे. ‘बिग बॉस १५’ च्या संडे का वारमध्ये देखील ती वेगळ्याच अंदाजात झळकली. इथे सध्या ती प्रतीक सेहजपालला पाठिंबा देत आहे.

‘नंबर लिख’, ‘शांती’ अशा म्युझिक व्हिडिओमध्ये देखील ती झळकली आहे. तिच्या अभिनयासह तिच्या डान्सचे देखील लाखो चाहते आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मायशा- ईशानच्या नात्याबद्दल उमरने केली ‘अशी’ कमेंट, सोशल मीडियावर चाहते बांधतायेत कौतुकाचे पूल

-कर्जात बुडालेल्या अमिताभ बच्चन यांचे तारणहार ठरले ‘यश चोप्रा’ आणि ‘केबीसी’

-सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर, कायमची मुंबई सोडणार शेहनाझ गिल? चाहते पडले चिंतेत

हे देखील वाचा