Monday, July 1, 2024

बापरे! १० वर्षाच्या रिलेशनशिप नंतर पूजा गौर आणि राज सिंगचे ब्रेकअप, पोस्ट द्वारे सांगितले ‘हे’ कारण

२०२० हे वर्ष सामान्य लोकांपासून सेलिब्रेटीज पर्यंत सर्वच लोकांसाठी त्रासदायक ठरत आहे. कोरोनाने प्रवेश केल्यानंतर या वर्षी अनेक गोष्टी बदलल्या. ऑफिसच्या कामापासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंत अनेक बदल ह्या वर्षाने केले. त्यातच आता टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री पूजा गौर हीने तिच्या आणि राजसिंग अरोराच्या नात्याबद्दल सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट शेयर केली आहे. त्यात तिने त्यांचे ब्रेकअप झाल्याचे सांगितले आहे. १० वर्ष नात्यात राहून त्यांनी आता ब्रेकअप झाल्याचे सांगितले.

https://www.instagram.com/p/CI2-GXJjQi1/

टीव्ही क्षेत्रातील लोकप्रिय जोडी असलेल्या पूजा गौर आणि राज सिंग अरोराचे नुकतेच ब्रेकअप झाले आहे. याबद्दलची माहिती स्वतः पूजाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंट वरून दिली आहे. तिच्या पोस्ट मध्ये तिने लिहले आहे की, ” २०२० वर्षात अनेक बदल घडले. काही चांगले तर काही वाईट. मागील काही महिन्यांपासून माझ्या आणि राजच्या नात्याबद्दल अनेक बातम्या येत होत्या. नेहमी कठीण निर्णय घेण्यासाठी वेळ लागतो आणि म्हणूनच त्याबद्दल बोलण्याआधी मला त्या गोष्टीला संपूर्ण वेळ द्यायचा होता. मी आणि राजने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आता जरी आयुष्यात आम्हाला वेगळ्या मार्गाने जायचे असले तरी देखील आमचं एकमेकांसाठी असलेलं प्रेम आणि आदर पूर्वीसारखाच राहील. मी नेहमी राजच्या भल्याचाच विचार करेन आणि राजच्या चांगल्यासाठी नेहमी प्रार्थना करेन. माझ्या आयुष्यावर राजचा खूप प्रभाव आहे. आम्ही नेहमीच चांगले मित्र होतो, आहोत आणि इथून पुढे देखील राहू. या नाजूक विषयाबद्दल बोलण्यास मला खूप वेळ लागला आणि हे सांगण्यासाठी मला खूप धाडस करावे लागले. शेवट मी एवढंच सांगेन आमच्या दोघांच्या खासगी आयुष्याचा आदर केल्याबद्दल आणि आम्हाला आमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.’
पूजाने ‘सावधान इंडिया’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले असून ती ‘कितनी मोहब्बत है’, ‘मन की आवाज : प्रतिज्ञा’ आणि ‘एक नई उम्मीद : रोशनी’ अशा मालिकांमध्ये तर ‘केदारनाथ’ या सिनेमात देखील काम केले आहे. तर राजसिंह अरोड़ा ‘गब्बर इज बॅक’ सिनेमात झळकला होता.

हे देखील वाचा