Friday, July 5, 2024

अमिताभ यांच्यासोबत असणाऱ्या अफेयरच्या प्रश्नावर उत्तर देताना रेखा म्हणाल्या होत्या…

बॉलिवूडच्या लोकप्रिय, दिग्गज अभिनेत्री आणि आपल्या सौंदर्याबरोबरच अभिनयाच्या जोरावर लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या अशा रेखा रविवार (१० ऑक्टोबर) आपला ६७ वा वाढदिवस साजरा करत आहेत. रेखा यांनी अनेक दशकं चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केले किंबहुना आजही करत आहेत. एव्हरग्रीन रेखा त्यांच्या चित्रपटांसोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील खूपच चर्चेत राहिला. आजही त्यांचे खासगी आयुष्य लोकांसमोर एक न उलगडलेले कोडेच आहे. मात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वांत गाजलेला एक किस्सा म्हणजे अमिताभ बच्चन आणि रेखा यांचे नाते. या जोडीने अनेक सुपरहिट सिनेमे दिले. ही जोडी जितकी पडद्यावर गाजली तितकीच वैयक्तिक आयुष्यातही गाजली. आज रेखा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नजर टाकूया त्यांच्या जीवनातील या पैलूवर.

बॉलिवूडमध्ये अशा अनेक हिट जोड्या आहेत ज्यांच्या पडद्यावरील केमिस्ट्रीमुळे त्यांची चाहत्यांमध्ये एक वेगळीच क्रेझ निर्माण झाली. या यादीत बॉलिवूड इंडस्ट्रीचे ‘शहेनशहा’ अर्थात अमिताभ बच्चन आणि सदाबहार अभिनेत्री रेखा यांचेही नाव येते. अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या एकेकाळी असणाऱ्या अफेअरच्या चर्चांमुळे ते आजही कायम चर्चेत असतात. आजही त्यांच्या अफेअरच्या कथा अनेकदा ऐकायला मिळतात. अमिताभ बच्चन आणि रेखा यांची प्रेमकहाणी ‘दो अंजाने’ चित्रपटाच्या सेटवरुन सुरू झाली. त्यावेळी अमिताभ बच्चन विवाहित होते. ७० च्या दशकात, फिल्म इंडस्ट्रीमध्ये अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या प्रेमाच्याच चर्चा रंगायच्या.

रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या अफेअरबद्दल जेव्हा अमिताभ यांच्या पत्नी जया बच्चन यांना समजले तेव्हा त्यांना खूपच काळजी वाटायची. अमिताभ बच्चन यांचे रेखासोबत नेहमीच गुप्त अफेअर होते. अमिताभ बच्चनसोबतच्या अफेअरबद्दल बोलताना, रेखा १९८४ मध्ये फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत बोलल्या होत्या. खरं तर, अमिताभ बच्चन यांनी रेखा यांच्यासोबतचे त्यांचे नाते नेहमीच नाकारले होते.

त्याबद्दल बोलताना रेखा म्हणल्या की, “त्यांनी हे त्यांच्या इमेजसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या मुलांसाठी केले आहे. मला वाटते की, हे खूप छान आहे लोकांना काय वाटते याचा मला काहीच फरक पडत नाही. लोकांना का माहित असावं माझे त्यांच्यावर प्रेम आहे किंवा त्यांचे माझ्यावर प्रेम आहे. मला याचा काहीच फरक पडत नाही की, लोक काय म्हणतील, जर त्यांनी मला वैयक्तिक सांगितले असते, तर मला दुःख झाले असते. मात्र, त्यांनी कधीच असे केले नाही. बच्चन यांनी १० लोकांबरोबर अफेअर नाही केले. ते आजही जुन्या विचारांचे आहेत आणि त्यांना कोणालाही दुःख द्यायचे नाही. मग ते त्यांच्या पत्नीला का देतील.”

रेखा यांनी असेही म्हटले होते की, अमिताभ बच्चन त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. जया बच्चन यांना रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, “ते एक चित्रपट अभिनेते आहेत आणि त्यांचे नाव इतर प्रत्येक अभिनेत्रीशी जोडलेले आहे आणि जर ते प्रत्येक अभिनेत्रीबद्दल विचार करू लागले तर मग त्याचे आयुष्य नरक होईल.”

रेखा यांनी १९९० मध्ये उद्योगपती मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर काही काळातच त्यांना समजले की, त्यांचा नवरा मानसिकरित्या खालावलेला आहे. अशा परिस्थितीत रेखा यांनी पती मुकेशला सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी घर सोडले. पण यानंतर मुकेश यांनी आत्महत्या केली. दोघांचे लग्न केवळ सात महिने टिकले, त्यानंतर रेखा आपले आयुष्य एकट्याच जगत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दहावी पास होताच मिळाले चित्रपटात काम करण्याचे बक्षीस, ‘या’ कारणामुळे नाव बदलून फिरत होती श्रृती मराठे

-विद्युत गर्लफ्रेंडसोबत करणार हटके लग्न; ‘वेडिंग प्लॅन’बद्दल म्हणाला, ‘आम्ही १०० पाहुण्यांसह स्कायडायव्हिंग…’

-KBC: ‘बिग बींमुळेच झालंय जिनिलियासोबत लग्न…’, रितेश देशमुखने केला मोठा खुलासा

हे देखील वाचा