Wednesday, July 3, 2024

लवकरच बोहल्यावर चढणार शिल्पा शेट्टीची ‘टुनकी’? अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा

अलीकडेच टेलिव्हिजनच्या लोकप्रिय आणि वादग्रस्त रियॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या १५ व्या सीझनमध्ये दिसलेली अभिनेत्री शमिता शेट्टी लवकरच लग्न करू शकते. अलीकडेच तिचा ४३वा वाढदिवस साजरा करणाऱ्या या अभिनेत्रीने तिच्या लग्नाच्या योजनांबद्दल खुलासा केला. गेल्या काही काळापासून मनोरंजन विश्वात लग्नाचा सीझन सुरू झाला आहे. फिल्मी दुनियेपासून ते टीव्ही जगतात अनेक स्टार कपल्स विवाहबंधनात अडकले आहेत. दरम्यान, आता लग्नाच्या वातावरणात शमिता शेट्टीनेही (Shamita Shetty) लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबद्दल खुलासा केला की, ती वधू बनण्यास तयार आहे.

आपल्या दमदार खेळाने चाहत्यांची मने जिंकणारी शमिता अभिनेता राकेश बापटसोबतच्या (Raqesh Bapat) नात्यामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. शमिता ‘बिग बॉस १५’ पूर्वी ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये देखील दिसली आहे. राकेश बापट देखील ‘बिग बॉस ओटीटी’चा भाग होता. या रियॅलिटी शोमध्ये शमिता आणि राकेश यांची भेट झाली, त्यानंतर त्यांच्या भेटीचे रुपांतर प्रेमात झाले.

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने राकेशसोबतच्या तिच्या नात्याबद्दल आणि लग्नाविषयी मोकळेपणाने सांगितले. तिने सांगितले की, तिला लवकरच राकेशशी लग्न करायचे आहे. या खास मुलाखतीदरम्यान अभिनेत्री म्हणाली की, “मी राकेशसोबतच्या माझ्या नात्याचा खूप आनंद घेत आहे. मी यावर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे,” असेही ती म्हणाली.

“यावर्षी माझे लग्न होत असून यासाठी देवाने मला साथ द्यावी, जेणेकरून यावर्षी माझे लग्न होऊ शकेल,” असेही ती म्हणाली. यादरम्यान, अभिनेत्रीने असेही सांगितले की, लॉकडाऊन आणि कोरोनाच्या काळात ती किती एकटी होती हे तिला जाणवले. शमिता पुढे म्हणाली की, “मी बऱ्याच काळापासून अविवाहित आहे आणि आजपर्यंत मी माझे आयुष्य माझ्या अटींवर जगत आहे.”

अभिनेत्री असेही म्हणाली की, “पूर्वी मला जोडीदार मिळत नव्हता, पण आता कोणीतरी माझ्यासोबत आहे याचा मला आनंद आहे. आता हे किती दिवस टिकते ते पाहावे लागेल. पण हो मला आता सेटल व्हायचे आहे आणि माझ्या कुटुंबाला पुढे न्यायचे आहे.” यादरम्यान शमिताने राकेशसोबतच्या तिच्या नात्याबद्दलही मोकळेपणाने सांगितले.

अभिनेत्रीने सांगितले की, “बिग बॉस १५ दरम्यान मी राकेशपासून दूर राहिली. त्यामुळे राकेश अजूनही माझा बॉयफ्रेंड आहे का, असा प्रश्न मला पडायचा.” माणसं बदलायला तीन-चार महिने पुरेसे आहेत असं तिला वाटायचे. म्हणून ती सगळ्यांना विचारायची की, तो आता तिचा बॉयफ्रेंड आहे की, पुढे गेला आहे. शमिता म्हणाली की, तो पुढे गेला तर ती काय करेन हे तिला समजत नव्हते.

हेही वाचा :

हे देखील वाचा