Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड ‘शो मस्ट गो ऑन’, म्हणत ‘या’ कलाकारांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावल्यानंतर कामात केले पुनरागमन

‘शो मस्ट गो ऑन’, म्हणत ‘या’ कलाकारांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावल्यानंतर कामात केले पुनरागमन

कोरोना काळाने आपल्या माणसांना गमावण्याचे दुःख काय असते हे दाखवून देण्यात कसलीच कसर सोडली नाही. कोरोना संसर्गाच्या काळात कित्येक लोकांनी आपला जीव गमावला. हे फक्त सर्वसाधारण व्यक्तींच्या आयुष्यात घडले नाही, तर बॉलिवूड विश्वातील अनेक कलाकारांनी आपल्या जवळच्या व्यक्ती गमावल्या आहेत. आपली जवळची व्यक्ती आपल्यापासून खूप दूर निघून जाण्याच दुःख खरंच खुप त्रासदायक असते. मात्र, दुःख मागे टाकत गेलेल्या व्यक्तीच्या आठवणी घेऊन पुढे जावे लागते. म्हणतात ना, ‘शो मस्ट गो ऑन’ अगदी तसेच आहे. आज आपण त्या कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्ती गमावल्या आहेत. या दुःखाच्या डोंगरातून सावरत ते पुन्हा कामावर परतले आहेत.

शहनाझ गिल आणि सिद्धार्थ शुक्ला

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने या जगाला निरोप घेऊन एक महिना उलटून गेला आहे. सिद्धार्थच्या अचानक झालेल्या या एक्सिटमुळे प्रत्येकासाठी ही वेळ दुःखाची होती. पण ज्या लोकांना सिद्धार्थच्या जाण्यामुळे सर्वात मोठा धक्का बसला, त्यात शहनाझ गिलही होती. तो गेल्यानंतर शहनाझ पूर्णपणे तुटली, त्यावेळी तिची अत्यंत वाईट अवस्था झाली होती. परंतु या कठीण परिस्थितीत अभिनेत्रीने स्वत:ला वेळ दिला आणि आता ती तिच्या जोडीदाराच्या मृत्यूच्या एक महिन्यानंतर कामावर परतणार आहेे. तिच्या आगामी चित्रपटाच्या निर्मात्याने याबद्दल माहिती दिली आहे.

Photo Courtesy Instagramshehnaazgill

ऋषी कपूर आणि नीतू कपूर

बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी बराच काळ आजारपणाशी लढल्यानंतर २०२० मध्ये ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांची पत्नी नीतू कपूर त्यांच्या शेवटच्या दिवसात त्यांच्यासोबत होत्या. नीतू यांनी आपले काम सोडून पतीची पूर्णपणे सेवा केली. त्यांच्या निधनानंतर त्या एकटेपणाला सामोर जात होत्या. अशा परिस्थितीत रणबीर आणि रिद्धिमा यांनी त्यांना प्रोत्साहन दिले आणि त्यांनी व्यावसायिक आघाडीवर पुनरागमन केले. त्या ‘जुग जुग जियो’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये दिसल्या. सर्वांनी त्यांचे खूप कौतुक केले.

सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रवर्ती

बॉलिवूडचा रायझिंग सुपरस्टार सुशांत सिंग राजपूतने अल्पावधीतच इंडस्ट्रीमध्ये खूप नाव कमावले. पण त्याच्या मृत्यूनंतर सर्व काही संपुष्टात आले. सुशांत त्याच्या चाहत्यांच्या आठवणीत राहिला. हा काळ त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसाठी देखील समस्यांनी भरलेला होता. तिला सुशांतला गमावण्याचे दु:ख होते तसेच तिला अंमली पदार्थाप्रकरणी जेलच्या हवेचा सामना करावा लागला. रियाचा उत्साहही चिरडला गेला. पण तिने स्वतःची काळजी घेतली आणि तिच्या जीवनात सकारात्मक बदल आणले. अभिनेत्रीचा ‘चेहरे’ हा चित्रपटही चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. जरी त्याचे शूटिंग आधीच केले गेले होते.

मंदिरा बेदी आणि राज कौशल

बॉलिवूड आणि टीव्हीच्या जगात दिसलेल्या मंदिरा बेदीसाठी २०२१ हे वर्ष देखील त्रासदायक आहे. तिच्या पतीचे आणि चित्रपट निर्माता राज कौशलचे हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्याच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. मंदिरासाठी तो खूप कठीण काळ होता. तिने काही काळ विश्रांती घेतली. नंतर ती परत आली. अभिनेत्रीने सोशल मीडियाद्वारे सांगितले की, आता ती कामावर परतली आहे आणि तिला पुन्हा आयुष्य सुरू करायचे आहे.

इरफान खान आणि बाबील

बॉलिवूड अभिनेता इरफान खानने आपल्या कारकिर्दीत उत्तम काम केले आणि जगभरात नाव कमावले. पण तो आयुष्याशी लढाई हरला आणि २०२० मध्ये त्याने झाला निरोप दिला. त्याच्या मृत्यूने चाहत्यांना देखील दुःखद झटका बसला. तसेच हा काळ त्याच्या कुटुंबातील सदस्यांसाठीही अडचणीचा होता. पण त्याचा मुलगा बाबीलने हे आव्हान स्वीकारले आणि वडील गेल्यानंतर स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा निर्णय घेतला. सध्या, त्याच्याकडे काही प्रोजेक्ट्स आहेत ज्याची घोषणा त्याने सोशल मीडियाद्वारे केली आहे. तो चाहत्यांना वडिलांच्या जुन्या आठवणींशीही जोडून ठेवतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

बऱ्याच काळापासून गायब असणारा इंडियन आयडलचा पहिला विजेता अभिजीत सावंत आहे तरी कुठे?

फॅशन वीकमध्ये जलवे दाखवल्यावर पॅरिसच्या रस्त्यांवर अभिषेक, आराध्यासोबत फिरताना दिसली ऐश्वर्या राय

रणबीरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटाचे शूटिंग पुढच्या वर्षी होणार सुरु, ‘या’ भूमिकेत दिसणार लव्हर बॉय

हे देखील वाचा