टेलिव्हिजन ते मोठ्या पडद्यापर्यंत खाष्ट सासूची भूमिका करून नावारूपाला आलेल्या अभिनेत्री उषा नाडकर्णी सध्या बऱ्याच चर्चेत आहेत. अलीकडे त्यांनी अनेक माध्यमांना मुलाखती दिलेल्या आहेत. त्यांनी मालिका, सिनेमा, बिग बॉस तसेच अगदी मास्टर शेफमध्ये काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अजूनही त्या काम करत आहेत. सध्या त्या मुंबईतील घरात एकट्याच राहतात. त्यांनी एका मुलाखतीत लग्नाबाबत भाष्य केले आहे.
या मुलाखतीत त्या म्हणाला की, “मी प्रेम वैगेरे केले नाही. लव्ह मॅरेज केले नाही. आईवडिलांनी मुलगा शोधला कारण मला लग्न करायचे नव्हते. मला लग्न करण्यात इंटरेस्ट नव्हता. पण नंतर लग्न झालं. झालं सगळं.”
अशातच त्यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणींना देखील उजाळा दिला. तेव्हा त्यांनी सांगितले की, “लहानपणी आम्ही १० बाय १० च्या खोलीत राहत होतो. नंतर आम्ही २ खोलीच्या घरात शिफ्ट झालो. तेथून २ बीएचकेमध्ये गेलो. मग माझं लग्न झालं. आणि मी वाकोल्याच्या घाणेरड्या इमारतीत राहायला आले. थर्ड क्लास एरिया. सगळे झोपडपट्टीतील लोक. त्यामुळे मी कधी कोणाला घरी बोलावले नाही. फंक्शनला कोणी गाडी पाठवली तरी मी मेन रोड पर्यंत यायला सांगायची. नंतर मी घर घेतलं. सगळ्या पायऱ्या चढून मी इथंपर्यंत पोहचले आहे. माणसं कमावता कमावता पैसे कमावणे देखील गरजेचे आहे.”
उषा नाडकर्णी यांना एक मुलगा आहे. तो कामानिमित्त सध्या बाहेर असतो. त्यामुळे त्या मुंबईत सध्या एकट्याच राहतात. उषा नाडकर्णी बिग बॉस मध्ये असताना त्यांचा मुलगा तिथे आला होता. त्यावेळी सगळ्यांना त्याची ओळख झाली. उषा नाडकर्णी या काही दिवसांपूर्वी हिंदी मास्टरशेफ मध्ये होत्या.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सलग 6 तास काम केले’, रश्मिकाने ‘कुबेरा’च्या शूटिंगचा अनुभव केला शेअर
मी लग्नात अयशस्वी झालो, पण घटस्फोटात यशस्वी झालो’; आमिर खानचे वक्तव्य चर्चेत