अभिनेत्री करिश्मा कपूरचे (Karishma Kapoor) एक्स हसबंड संजय कपूर यांचं १२ जूनला निधन झालं. पोलो खेळताना त्यांना अचानक हार्ट अटॅक आला. करिश्मा आणि संजयचं लग्न सप्टेंबर 2003 मध्ये झालं होतं, पण ते जास्त काळ टिकू शकलं नाही. त्यांनी 2016 मध्ये घटस्फोट घेतला. करिश्माने त्याच्यावर काही आरोपही केले होते, त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाची खूप चर्चा झाली होती.
करिश्मापासून वेगळं झाल्यावर संजयने आपलं आयुष्य पुढे नेलं आणि त्याने प्रिया सचदेवा नावाच्या महिलेशी लग्न केलं. पण करिश्माने मात्र दुसरं लग्न केलं नाही. संजय आणि करिश्माला दोन मुलं आहेत – एक मुलगी समायरा आणि एक मुलगा कियान. करिश्माने दोघांचंही पालनपोषण अगदी मन लावून केलं. लोकांच्या मनात कायम एकच प्रश्न होता – करिश्माने पुन्हा लग्न का केलं नाही? 2017 मध्ये एका मुलाखतीत करिश्माचे वडील रणधीर कपूर यांनी यावर थेट बोललं होतं.
रणधीर कपूर यांनी करिश्माच्या दुसऱ्या लग्नाबद्दल बोलताना म्हटलं होतं, “माझ्या मते करिश्मा आपल्या आयुष्यात चांगली सेटल आहे आणि ती आनंदात आहे. मी कधीच तिच्याशी लग्नाच्या विषयावर बोललो नाही, पण जर तिला पुन्हा लग्न करायचं असेल, तर माझा आशीर्वाद तिच्यासोबत असेल. मला वाटत नाही की ती सध्या पुन्हा लग्न करायला इच्छिते. ती एक आनंदी आई आहे. पण तिला कधी वाटलं, तर ती नक्की लग्न करू शकते. पण आत्ताच्या घडीला ती लग्न करायच्या मूडमध्ये नाही. जशी आहे, तशीच ती खूश आहे.” रणधीर म्हणाले की, “करिश्मा एक खूप छान आई आहे. ती आपल्या दोन्ही मुलांची खूप चांगली काळजी घेते. आणि तिला सध्या दुसरं लग्न करायचं नाही.”
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘रेडी’ चित्रपटात जेनेलियाला न घेतल्याबद्दल आली अभिनेत्रीची प्रतिक्रिया, ऐकून सलमान खान होईल खुश
आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’मध्ये दिसणार मुलगा जुनैद खानच्या आगामी सिनेमाचा टिझर