Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड अंकिताला बसलेला सुशांतच्या मृत्यूचा मोठा धक्का; म्हणाली होती, ‘तिच्याकडे एवढी हिम्मत नव्हती की…’

अंकिताला बसलेला सुशांतच्या मृत्यूचा मोठा धक्का; म्हणाली होती, ‘तिच्याकडे एवढी हिम्मत नव्हती की…’

काही जोड्या तुटल्यानंतरही कायम प्रेक्षकांच्या आठवणीत राहतात. अशाच जोड्यांमध्ये समावेश होतो, ते म्हणजे अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत यांचा. विशेष म्हणजे, अंकिता आणि सुशांत हे जेव्हा ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत सोबत काम करत होते, तेव्हा त्यांना या मालिकेतून अमाप प्रसिद्धी मिळाली होती. इथूनच त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली होती. परंतु ही जोडी तुटून आता खूप मोठा काळ लोटला. असे असले, तरीही त्यांच्यातील मैत्री कायम होती. या जोडीतील एक जण आज आपल्यात नाही. तो म्हणजे अभिनेता सुशांत सिंग राजपूत, पण प्रत्येकाच्या मनात सुशांतच्या आठवणी जिवंत आहेत. येत्या जूनमध्ये सुशांतला जाऊन २ वर्षे पूर्ण होतील. जेव्हा सुशांतने जगाचा निरोप घेतला, तेव्हा अंकिताने एका मुलाखतीत त्याच्या मृत्यूनंतरच्या घटनांचा खुलासा केला होता. शुक्रवारी (२१ जानेवारी) सुशांतची ३६ वी जयंती आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया अंकिताने केलेल्या खुलास्यांबद्दल…

काय म्हणाली होती अंकिता? तेच आज आपण या लेखात पाहणार आहोत. अंकिताने मुलाखतीत सांगितले होते की, “सुशांतच्या मृत्यूनंतर तिने सोशल मीडियावर कोणतीच पोस्ट शेअर नव्हती केली. त्यामुळे अनेकांनी तिला टोमणे मारले होते. प्रेक्षकांच्या अनेक प्रश्नांना तिला सामोरे जावे लागले होते. याबाबत तिने पोस्ट शेअर न केल्याचे कारण देखील सांगितले होते. तिने सांगितले की, त्यावेळेस तिच्याकडे एवढी हिम्मत नव्हती की, ती सुशांतचे फोटो शेअर करून त्याला श्रद्धांजली अर्पण करेल.”

अंकिताने पुढे सांगितले होते की, “ज्या दिवशी सुशांतचा मृत्यू झाला त्यादिवशी मी सोशल मीडियावर कोणतीच पोस्ट शेअर केली नव्हती. या गोष्टीवरून सगळ्यांनी मला जज करायला सुरुवात केली होती. लोकांना नक्की अपेक्षा काय आहेत? हे समजून घेणं खरचं खूप अवघड आहे. आपल्या जवळची कोणती व्यक्ती हे जग सोडून गेल्यावर आपण काय नेहमी पोस्ट करत बसतो का?”

हे पाहिलं का? प्रेक्षकांवर अभिनयाची जादू करणारे ‘आशिकी’मधील कलाकार कुठे आहेत?

“मी आजपर्यंत कधी त्याचा फोटो शेअर करून त्याला आरआयपी असं नाही म्हणू शकले, कारण त्याच्या मृत्यूवर आजही माझा विश्वास बसत नाहीये. त्याला श्रद्धांजली वाहायची हिम्मत माझ्यात तेव्हाही नव्हती आणि आजही नाहीये,” असेही अंकिताने सांगितले होते.

https://www.facebook.com/SushantSinghRajput/photos/a.377483425777360/473535262838842/?type=3

तिने पुढे सांगितले की, “सुशांतच्या मृत्यूनंतर मी आणि माझ्या कुटुंबाने आणि सुशांतच्या कुटुंबाने खूप गोष्टी सहन केल्या आहे. सुशांतचा मृत्यू ही गोष्ट नेहमीच माझ्यासोबत राहणार आहे. मी आता कुठे या घटनेतून नॉर्मल झाली आहे. पण मला खूप काही सहन करायला लागलं होतं. मीच काय पण संपूर्ण जग त्याच्यासाठी रडत होते. कालच एक स्त्री माझ्याकडे आली होती, आणि ती सुशांतच्या मृत्युमुळे खूप रडत होती. मला असं वाटतं मी सुशांतसोबत बोलू शकते, त्याला हे सांगू शकते की, बघ सगळेजण तुझ्यासाठी रडत आहेत. सगळेजण किती प्रेम करतात तुझ्यावर.”

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून सुशांत घराघरात पोहोचला होताच, परंतु तो जेव्हा रुपेरी पडद्यावर झळकू लागला, तेव्हा त्याच्या प्रसिद्धीत कमालीची वाढ झाली होती. त्याने जवळपास १०-१२ चित्रपटात काम केले. त्यात ‘दिल बेचारा’, ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’, ‘काय पो छे’, ‘केदारनाथ’, ‘राबता’ यांसारख्या हिट चित्रपटांचा समावेश आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा