Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड बॉलिवूडमधील ‘या’ दिग्गज अभिनेत्यासोबत करायचे होते करिश्माला लग्न, पण ऐनवेळी झाला असा घोळ

बॉलिवूडमधील ‘या’ दिग्गज अभिनेत्यासोबत करायचे होते करिश्माला लग्न, पण ऐनवेळी झाला असा घोळ

अभिनेत्री करिश्मा कपूरचे (Karishma Kapoor) रील लाइफ यशस्वी झाले असले तरी खऱ्या आयुष्यात तिला अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. खरे तर करिश्माचे लग्न एकेकाळी अभिषेक बच्चनसोबत होणार होते, दोघांचीही एंगेजमेंट झाली होती पण शेवटच्या प्रसंगी त्यांचे लग्न मोडले. असे म्हटले जाते की करिश्माची आई बबिता यांना बच्चन कुटुंबाने त्यांच्या मालमत्तेचा काही भाग अभिषेक बच्चनला हस्तांतरित करावा अशी इच्छा होती. त्यावेळी बच्चन कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नव्हती तसेच अभिषेक बच्चनची कारकीर्दही डळमळीत होती असे म्हटले जाते.

यामुळे करिश्माच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी बबिताने ही मागणी केली होती, मात्र बच्चन कुटुंबाने ही मागणी फेटाळून लावली. मात्र, नंतर करिश्मा आणि अभिषेक बच्चन यांचे लग्न होऊ शकले नाही. मात्र, तुम्हाला माहित आहे का की, अभिषेक बच्चनच्या आधीही करिश्मा अक्षय खन्नासोबत लग्न करणार असल्याची चर्चा होती. करिश्माचे वडील रणधीर कपूर यांना स्वतःच्या मोठ्या मुलीचे लग्न खन्ना कुटुंबात व्हावे अशी इच्छा होती, त्यामुळेच रणधीर कपूर यांनी विनोद खन्ना यांच्याशी या नात्याबद्दल बोलले. मात्र, इथेही करिश्माची निराशा झाली.

खरे तर करिश्माचे करिअर शिखरावर होते जेव्हा रणधीरने मुलीच्या नात्याबद्दल बोलायला सुरुवात केली. करिश्मा सलमान खान आणि गोविंदा यांसारख्या बड्या स्टार्ससोबत दिसली होती. त्याचवेळी अक्षय खन्ना चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण करत होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बबिता आपल्या करिअरच्या शिखरावर असताना आपल्या मुलीचे लग्न व्हावे असे वाटत नव्हते आणि बबिता यावर ठाम होती असे म्हटले जाते. याचा परिणाम असा झाला की करिश्माचे लग्न इथेही थांबले. करिश्मा कपूरने 2003 मध्ये बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केले होते पण 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

हेही वाचा- लयचं अगाऊ झालाय करीना अन् सैफचा जहांगीर, छोट्या खानचा व्हिडिओ पाहिला का?
‘तो सुशांत सिंगचा मारेकरी नाही…’, अभिनेत्री स्वरा भास्करने केले करण जोहरचे समर्थन
‘…तर गप्पच बसा’ तब्बल एका वर्षानंतर राज कुंद्राने अश्लिल चित्रफित प्रकरणावर दिली पहिली प्रतिक्रिया

हे देखील वाचा