Saturday, April 20, 2024

भयंकर! बॉलीवूडमधील ‘या’ अभिनेत्रीला जावे लागले घरगुती हिंसाचाराला सामोरे

घरगुती हिंसाचार हा आपल्या देशातील एक गंभीर विषय आहे. देशातील प्रत्येक दुसरी महिला घरगुती हिंसाचाराने पीडित असल्याचे काही रिसर्चमधून समोर आले आहे. खूप महिलांनी या विरुद्ध आवाज उठवला आहे. अभिनेत्री सहसा अशा विषयांत मागे नसतात. त्या जगासमोर येत अशा गोष्टींचा खुलासा करतात.

यातच अगदी अलीकडे अभिनेत्री श्वेता तिवारी ही देखील घरगुती हिंसाचाराची शिकार बनली होती. 8 मार्च रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त श्वेताने आपली मुलगी पलकसाठी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. या सोबतच तिने घरगुती हिंसाचार सहन करणाऱ्या महिलांना या विरुद्ध आवाज उठवायला सांगितले होते.

तिने 2007 मध्ये तिचा पहिला पती राजा चौधरी सोबत घटस्फोट घेऊन अभिनव कोहली याच्यासोबत दुसरे लग्न केले. दोन वर्षापूर्वी श्वेताने अभिनववर असा आरोप लावला होता की, अभिनवने तिच्यावर हात उचलला होता. श्वेता व्यतिरिक्त चित्रपट सृष्टीत अश्या अनेक अभिनेत्री आहेत, ज्या घरगुती हिंसाचाराच्या शिकार बनल्या आहे. तर मंडळी आज आपण अशा अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या घरगुती हिंसाचाराच्या शिकार झाल्या.

रश्मी देसाई
बिग बॉस 13 ची स्पर्धक आणि अभिनेत्री रश्मी देसाई ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिने उतरण सीरियलमधील को स्टार ‘नंदिष संधू’ याच्यासोबत लग्न केले आहे. 2016 मध्ये त्या दोघांनी घटस्फोट घेतला. तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, नंदिष तिच्यावर संशय घेत असे आणि काम करू देत नसे.

वाहबिज दोराबजी
वाहबिज दोराबजी या अभिनेत्रीने तिचा पती आणि सासू सासरे यांच्याविरुद्ध घरगुती हिंसाचार केल्याबद्दल तक्रार केली होती. अभिनेता विवियन डिसेना आणि वाहबिज दोराबाजी यांची ओळख प्यार की एक कहाणी या सीरियलमधून झाली 2013 मध्ये त्या दोघांनी लग्न केले आणि काही वादामुळे 2016 ला त्या दोघांनी घटस्फोट घेतला.

दीपशिखा नागपाल
अभिनेत्री दीपशिखा नागपाल ही आपल्या वैवाहिक जीवनाबद्दल खूपच चर्चेत होती. तिने जीत उपेंद्र याच्यासोबतचे पहिले लग्न तुटल्यानंतर मॉडेल केशव अरोरा याच्या सोबत दुसरे लग्न केले होते. पुढे तिने केशवच्या विरोधात त्याने तिला मारलं आहे अशी तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर तिने केशवकडून घटस्फोट घेतला.

मंदाना करिमी
बिग बॉस स्पर्धक आणि अभिनेत्री मंदाना करीमी हीने तिचा बॉयफ्रेंड गौरव गुप्ता यांच्या सोबत 2017 मध्ये लग्न केले होते. लग्नाच्या काही महिन्यांनंतर तिने तिच्या पतीवर अन्याय केला आहे, अशी तक्रार केली. तिने असा आरोप लावला होता की, गौरव तिला काम करू देत नाही. अगदी तिच्या मित्र मैत्रीणीना भेटायला देखील तो बंदी घालतो. त्याचे आई वडीलही तिच्याशी नीट वागत नाहीत.

हे देखील वाचा