टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने अभिमानाने देशाची मान उंचावली आहे. नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. नीरजच्या या विजयाने प्रत्येकजण खूप आनंदी आहे. संपूर्ण देश मिळून त्याच्या विजयाचा आनंद साजरा करत आहे आणि त्याचे खूप अभिनंदन करत आहे. दरम्यान, अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनीही नीरज चोप्राला त्याच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला १३ वर्षानंतर सुवर्णपदक मिळाले आहे. भारतातील सर्व नागरीकांना नीरजच्या या ऐतिहासिक विजयाचा अभिमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही त्याला शुभेच्छा मिळाल्या. पण या दरम्यान, चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी अशा प्रकारे अभिनंदन केले, जे पाहून नेटकरी संतापले आहेत.
अशोक पंडित यांनी या विजयाला राजकारणाचा रंग दिला. त्यांनी नीरजच्या ध्वज फोटोसह ट्वीट केले आणि लिहिले की, “राजीव गांधींचे नाव काढताच सोने आले.” खरं तर, अलीकडेच पीएम मोदींनी राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार केले. आता अशोक यांच्या या ट्वीटमुळे खूप चर्चा रंगली आहे. युजर्स त्यावर जोरदार कमेंट्स करत आहेत.
राजीव गांधी का नाम हटाते ही गोल्ड़ आ गया ????????#Panauti pic.twitter.com/e78hgKjJ36
— Ashoke Pandit (@ashokepandit) August 7, 2021
एका ट्विटर युजरने म्हटले की, “सोनं मिळाल्यामुळे तुम्ही खुश नाही का?” दुसऱ्याने लिहिले, “आता किमान यावर तरी राजकारण करू नका.” आणखी एका युजरने रागाच्या इमोजीसह लिहिले, “या जगात नसलेल्या व्यक्तीबद्दल असे लिहीताना तुम्हाला लाज वाटत नाही का?”
नीरजच्या या आभाळा एवढ्या विजयानंतर अक्षय कुमार, अजय देवगण, तापसी पन्नू, लता मंगेशकर, अभिषेक बच्चन, मधुर भांडारकर, सनी देओल इत्यादी अनेक कलाकारांनी नीरज चोप्राला शुभेच्छा दिल्या.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-इंडियन आयडलच्या ‘या’ स्पर्धकाचे फळफळले नशीब, करण जोहरकडून मिळाली थेट ‘धर्मा’साठी गाणी गाण्याची संधी
-अफेअरच्या चर्चांमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कियाराला रस्त्यावरच घेतले उचलुन, पुढे जे झाले…