भारतीय चित्रपटांचा इतिहास खूपच सुवर्ण आहे. अनेक दिग्दर्शकांसह अनेक कलाकारांनी याला बळकटी दिली आहे. बलराज साहनी हे असे एक नाव आहे, ज्यांचे सिनेमातील योगदान कधीच विसरता न येणारे आहे. बलराज यांचे लहानपणीचे नाव ‘युधिष्ठिर साहनी’ होते. बलराज साहनी यांचा जन्म १ मे, १९१३ रोजी ब्रिटिश भारतातील म्हणजेच आताचे पाकिस्तानातील रावळपिंडी येथे झाला होता. त्यांची गणना सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांमध्ये केली जाते. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने, त्यांच्या जीवनाशी संबंधित काही रंजक किस्से जाणून घेऊयात.
चित्रपटांव्यतिरिक्त बलराज साहनी हे सामाजिक कार्यांमध्येही खूप गुंतलेले असायचे. १९३८ मध्ये त्यांनी महात्मा गांधींसोबत देखील काम केले होते. यानंतर ते बीबीसी लंडन हिंदीमध्ये सामील होण्यासाठी इंग्लंडला गेले. बलराज साहनी यांना सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड होती. ज्यासाठी ते इंडियन पीपल थिएटरमध्ये सामील झाले.
आपल्या पात्रांना जिवंत बनवण्यासाठी, बलराज साहनी ती पात्रं प्रत्यक्षात जगत असत. त्यांच्या दमदार अभिनयाचे हेच कारण होते, ज्याचे खूप कौतुक झाले. याच संदर्भात ते एकदा जेलमध्येही गेले होते. दिलीप कुमार यांच्या म्हणण्यावरुन के. आसिफने ‘हलचल’ या चित्रपटात बलराज यांना महत्त्वपूर्ण भूमिका दिली. या चित्रपटात त्यांनी जेलरची भूमिका साकारली होती. के. आसिफला जेलरची भूमिका अस्सल बनवायची होती. यासाठी त्यांनी काही नेते व नंतर जेल प्रशासनालाही भेट दिली. आपली भूमिका अप्रतिम व्हावी, अशी इच्छा बलराज साहनींचीही होती. यासाठी ते उत्सुकतेने आसिफसोबत आर्थर रोड कारागृहात गेले आणि तुरुंगातील जीवन कसे असते, याची माहिती घेतली.
कोणाला वाटले ही नसेल की, या चित्रपटाचे पात्र निवडताना बलराज साहनींना खऱ्या आयुष्यात देखील तुरुंगात रहावे लागेल. एके दिवशी अचानक बातमी आली की, कम्युनिस्ट पक्षाची मिरवणूक परळमधून बाहेर पडणार आहे. डाव्या विचारसरणीचे समर्थक बलराज त्यांच्या पत्नीसह मिरवणुकीत सामील झाले. पण त्यादरम्यान हिंसाचार सुरू झाला. बर्याच जणांसह बलराज साहनी यांना देखील अटक करण्यात आले.
एके दिवशी जेलरने बलराज साहनींना बोलावले आणि म्हणाले की, त्याने त्यांना कुठेतरी पाहिले आहे. त्यावेळी के. आसिफसुद्धा तिथे बसले होते. के. आसिफच्या म्हणण्यावरून, जेलरने त्यांना तुरुंगात राहून शूटिंग करण्याची परवानगी दिली. ते सकाळी शूटिंगवर जात असत आणि संध्याकाळी तुरुंगात परत येत असत. त्यांनी तीन महिने तुरुंगात राहून, ‘हलचल’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते.
अशा या अभिनेत्याला दैनिक बोंबाबोंबकडून खूप खूप शुभेच्छा…!!!
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-