Wednesday, July 3, 2024

बिग बॉस १५: सलमान खानचा शो दोन आठवडे वाढवला? ‘या’ दोन स्पर्धकांची होणार एन्ट्री

टेलिव्हिजनचा सर्वात वादग्रस्त शोपैकी एक असलेला ‘बिग बॉस’ हा रियॅलिटी होय. या शोमध्ये सतत कोणाचे ना कोणाचे वाद होताना पाहायला मिळतात. आता ‘बिग बॉस १५’ मध्ये प्रेक्षकांना हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे. शोच्या दिवशी स्पर्धक आपापसात भांडताना दिसतात. वीकेंड का वार आश्चर्याने भरलेला होता. उमर रियाज शोमधून बाहेर पडल्यानंतर आता सलमान खान आणखी एक मोठी घोषणा करणार आहे. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसणार आहे. हा बिग बॉसचा शेवटचा आठवडा असणार होता. पण आता हा शो २ आठवडे वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शोचा एक नवीन प्रोमो चॅनलने शेअर केला आहे. ज्यामध्ये सलमान (Salman Khan) शो दोन आठवड्यांनी वाढवल्याची घोषणा करताना दिसत आहे. सलमानची ही घोषणा ऐकल्यानंतर प्रत्येक स्पर्धकाची प्रतिक्रिया खूप वेगळी होती.

सलमान खानने केली घोषणा

व्हिडिओमध्ये सर्व स्पर्धक लिव्हिंग एरियामध्ये बसलेले दिसत आहेत आणि बिग बॉस त्यांना सांगतात की, फिनालेचे तिकीट जिंकण्याची लढाई अद्याप संपलेली नाही. त्यानंतर सलमान स्पर्धकांना एक आनंदाची बातमी असल्याचे सांगतो. हा शो दोन आठवडे वाढवला जात आहे. हे ऐकल्यानंतर राखी सावंत (Rakhi Sawant) आनंदाने ओरडू लागते, तर निशांत आणि शमिता शेट्टीला (Shamita Shetty) धक्का बसलेला दिसत आहे.

दोन स्पर्धकांची होणार एन्ट्री

माध्यमांतील वृत्तानुसार, शोमध्ये पुन्हा एकदा राजीव अडातिया आणि विशाल कोटियन यांची एन्ट्री होणार आहे. दोघेही वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून येणार आहेत. पण विशाल आता कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. याबाबतची माहिती त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून दिली आहे. आता विशालऐवजी राजीवसोबत कोणाची एन्ट्री होते हे पाहावे लागेल.

माध्यमांतील वृत्तानुसार, शोचा फिनाले बायो बबलमध्ये होणार आहे. शोचे फक्त काही क्रू या फिनालेचा भाग असतील. उमर रियाजच्या शोमधून बाहेर पडल्यानंतर आता राखी सावंत, करण कुंद्रा, शमिता शेट्टी, निशांत भट, तेजस्वी प्रकाश, रश्मी देसाई, देवोलीना भट्टाचार्जी आणि अभिजित बिचुकले उरले आहेत.

हेही वाचा  :

 

 

हे देखील वाचा