Monday, June 9, 2025
Home कॅलेंडर दुर्दैव! ४७व्या वर्षीच जगाचा निरोप घेतलेल्या संजीव कपूर यांच्या ‘त्या’ दोन इच्छा शेवटपर्यंत राहिल्या अपुर्ण

दुर्दैव! ४७व्या वर्षीच जगाचा निरोप घेतलेल्या संजीव कपूर यांच्या ‘त्या’ दोन इच्छा शेवटपर्यंत राहिल्या अपुर्ण

बॉलीवूडमध्ये आजपर्यंत अनेक असे कलाकार झाले आहेत, ज्यांनी आपल्या जबरदस्त अभिनयाने अनेक पात्र अजरामर केली. अभिनय म्हटलं की त्या कलाकारांचे चेहरे आजही प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर येतात. यातीलच एक खास नाव म्हणजे संजीव कपूर. असा एक कलाकार, ज्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक भूमिका कायमस्वरुपी अजरामर केल्या. तर मंडळी आज आपण याच महान अभिनेत्याबद्दल फारशा माहित नसलेल्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

संजीव कपूर यांचा जन्म ९ जुलै १९३८मध्ये गुजरात राज्यातील सुरत येथे झाला. त्यांचे खरे नाव हरिहर जरीवाला असे होते. परंतू सिनेमात त्यांची ओळख अखेरपर्यंत संजीव कपूर अशीच राहिली. म्हणतात ना, काही लोकं मोठे होऊन काय करणार हे बालपणीच त्यांच्या वर्तनातून दिसतं, तसंच काहीसं संजीव कपूर यांच्याबद्दलही झालं. त्यांनी अगदी बालवयातच सिनेमात काम करण्याची खुनगाठ मनाशी पक्की बांधली होती. हळू हळू एक एक टप्पा पार करत वयाच्या २२व्या वर्षी त्यांनी १९६० सालात हे स्वप्न अखेर पुर्ण केलेच.

स्वप्न पुर्ण झाली, यश पाहिले तरीही संजीव कपूर यांना वैयक्तिक आयुष्यात मात्र अनेक चढउतार पाहायला मिळाले. एवढे नाव कमावून, एवढे हिट सिनेमे देऊनही संजीव कपूर यांच्या दोन इच्छा मात्र अपुर्ण राहिल्या. अगदी त्या कधीच पुर्ण झाल्या नाहीत.

संजीव कुमार यांनी “हम हिंदुस्थानी” या चित्रपटातून अभिनय कारकिर्दीला सुरवात केली होती. या चित्रपटात त्यांनी एका हवालदाराची भूमिका निभावली होती. विशेष म्हणजे त्यांना या चित्रपटात एकही सवांद त्यांच्या वाट्याला आला नव्हता. हवालदाराच्या रूपात कोर्टाबाहेर उभे राहणे एवढेच काय ते त्यांचे काम होते. हम हिंदुस्थानी चित्रपटानंतर त्यांना अनेक चित्रपटात काम मिळायला सुरवात झाली. बचपन, शिकार यासारख्या चित्रपटात त्यांनी जरी काम केले होते तरीही अशा चित्रपटांमधून त्यांना फारशी ओळख मिळाली नव्हती. मात्र १९७० साली आलेल्या ‘खिलौना’ सिनेमाने मात्र ते रातोरात स्टार झाले.

संजीव कपूर यांनी अनेक चित्रपटांत खासकरुन पोलीसांच्या अधिकाऱ्यांच्या भूमिका साकारल्या. अनेक भुमिकांत ते प्रेक्षकांच्या कायमच लक्षात राहिले. एका बाजूला तुफान यश जरी ते पाहात असले तरीही दुसऱ्या बाजूला वेगळेच अपयश त्यांना येत होते.  अभिनेत्री अंजू महेंद्र यांनी संजीव कपूर नंतर दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अनेक गोष्टी उघड केल्या होत्या. त्या एका मुलाखतीमध्ये म्हणाल्या होत्या, ‘संजीव कपूर यांचे ज्या-ज्या महिलांशी प्रेमसंबंध आले, त्या-त्या महिलांवर त्यांनी शंका घेतल्या. त्यांना नेहमी वाटे की या महिला त्यांच्यावर नाही तर त्यांच्या पैशांवर प्रेम करतायत. याचमुळे त्यांचे लग्नही झाले नाही. संजीव कपूर यांचे नाव सुलक्षणा पंडित, सुचित्रा सेन, जया प्रदा, हेमा मालिनीशी जोडली गेली परंतू त्यांची कुणाशीही आयुष्यभरासाठी जोडी जमू शकली नाही.’

याच मुलाखतीमध्ये अंजू महेंद्र म्हणाल्या होत्या, ‘संजीव कपूर यांना मुंबई शहरात घर घ्यायचे होते. स्वत:चा या शहरात बंगला असावा असे त्यांचे स्वप्न होते. परंतू जेव्हा जेव्हा त्यांना एखादा बंगला पसंत पडायचा, तेव्हा तेव्हा ते यासाठी पैसा जमा करु लागायचे. परंतू पैसे जमा होताच बंगल्याची किंमत वाढलेली असायची. असे अनेक वर्ष सुरु होते. अनेक वेळा तर त्यांना आवडलेल्या जमिनी कायदेशीर वादात अडकलेल्या होत्या. याचमुळे ते स्वत:चे घर कधीही विकत घेऊ शकले नाहीत.’

संजीव कपूर यांना हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्याची खूप इच्छा होती. त्यांनी तसा प्रस्ताव हेमा मालिनी यांच्यासमोर दोन वेळा ठेवला परंतू दोनही वेळा हेमा मालिनींनी तो प्रस्ताव फेटाळून लावला. संजीव कपूर यांनी आपला प्रस्ताव मांडण्यासाठी धर्मेंद्र यांची मध्यस्थ म्हणून निवड केली होती परंतू खुद्द धर्मेंद्र यांनीच आपल्या लग्नाचा प्रस्ताव मालिनींच्या समोर ठेवला होता. पुढे त्यांनी याला होकार दिला व पहिले लग्न झालेल्या धर्मेंद्रशी हेमा मालिनी यांचे लग्न झाले.

ही घटना वाटते तेवढी नक्कीच सोप्पी नव्हती. हेमा व धर्मेंद्र सुखी संसार करु लागले. परंतू या गोष्टीमुळे संजीव कपूर खुपच दुखावले. हळू हळू ते व्यसनाच्या अधीन झाले. पुढे त्यांनी कधीच कोणत्याच अभिनेत्रीला लग्नासाठी विचारले नाही.

संजीव कुमार यांनी वयाच्या ४७व्या वर्षी ६नोव्हेंबर १९८५ला या जगाचा निरोप घेतला. त्यांनी आपल्या संपुर्ण कारकिर्दीत अनेक चांगले चित्रपट केले. ते नेहमी म्हणायचे, ‘कलाकार हा असा असला पाहिजे की, आपल्या उत्तम अभिनयाने त्याने ती भूमिका खूप चांगली करून दाखवली पाहिजे.’

संजीव कुमार यांच्या सन्मानार्थ भारतीय पोस्ट विभागाने ३ मे २०१३ रोजी एक खास टपाल तिकीटही जारी केले होते . संजीव कुमार यांच्या निधनानंतर त्यांचे १०चित्रपट प्रदर्शित झाले होते. हा एकप्रकारचा मोठा विक्रमच त्यावेळी झाला होता. यातील बहुतेक चित्रपटांचे चित्रिकरण थोडेफार बाकी होते. नंतर या चित्रपटांच्या कथा बदलून ते प्रदर्शित करण्यात आले. ‘प्रोफेसर की पडोसन’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ते गेल्यानंतर तब्बल ८ वर्षांनी अर्थात १९९३ मध्ये प्रदर्शित झाला होता.

 

हे देखील वाचा