जगभरात कॅंसर म्हणजेच कर्करोगाप्रती जागरूकता पसरवण्यासाठी गुरुवारी (४ फेब्रुवारी) जागतिक कर्करोग दिवस साजरा करण्यात आला. कर्करोगाचा सामना करणे ही काही सोपी गोष्ट नाही. या रोगाशी लढा देण्यासाठी जगभरात योजना चालवल्या जात आहेत. याव्यतिरिक्त कर्करोगाविरुद्ध अनेक मोठ-मोठे कलाकारही आपले योगदान देत आहेत. यामध्ये बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयचाही समावेश आहे. विशेष म्हणजे विवेक १८ वर्षांपासून हे काम करत आहे.
सन २००४ मध्ये विवेक ओबेरॉय कँसर पेशंट्स एँड असोसिएशन (CPAA) जोडला गेला आहे. तो सकारात्मक बदल करण्याच्या उद्देशाने आला आणि त्याने १८ वर्षांपूर्वी आपला वाढदिवस कर्करोगाने पीडित असलेल्या मुलांसोबत साजरा केला. त्यांना आनंदित करण्यासाठी विवेकने कर्करोगापासून सुटका झालेल्या लोकांना आमंत्रित केले आणि त्यांना देवदूत म्हणून बोलावले.
कर्करोगाविरुद्ध विजय मिळवलेल्या लोकांनी इतर मुलांंना या रोगाविरुद्ध लढण्यासाठी भावनात्मकरीत्या प्रेरित केले. ही योजना आजपर्यंत सुरु आहे. तेव्हापासून आजपर्यंत विवेक आपला वाढदिवस त्यांच्यासोबतच साजरा करतो आणि त्यांना कर्करोगाविरुद्ध जिंकण्यासाठी प्रोत्साहित करतात.
Every life is precious and not a single soul should be lost due to cancer. Been 18 years of supporting the young warriors and I will continue to do so with all my might. I urge everyone to come forward and help these children live a cancer-free life. #WorldCancerDay @CPAAIndia pic.twitter.com/YUSmUMVuXR
— Vivek Anand Oberoi (@vivekoberoi) February 4, 2021
मागील १८ वर्षांमध्ये विवेकने २.५ लाखांपेक्षा अधिक वंचित मुलांना कर्करोगाशी लढा देण्यासाठी भावनात्मक आणि आर्थिकरीत्या मदत केली आहे. CPAA सोबत विवेकने टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या बाहेर फुटपाथवर झोपणाऱ्या कुुटुंबालाही वाचवले. त्यांना राहण्यासाठी त्याने जागा दिली आणि त्यांच्या मुलांना घातक रोगाशी लढण्यास आर्थिक मदत केली. त्याने डॉक्टरांसोबत संबंध प्रस्थापित केले. सोबतच धन्यवाद देणे आणि कोणतेही पैसे न घेण्यासाठी मनवले. यासह त्याने सवलतीच्या दरात जीवनरक्षक औषधे मिळवण्याविषयी आणि फार्मास्युटिकल कंपन्यांकडून सीपीएएबरोबर भागीदारी करण्याविषयी बोलले आहे.
विवेक ओबेरॉय १८ वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करून शेतकरी आणि त्याच्या कुटुंबासाठी एक आशीर्वाद ठरत आहे, ज्यांना कर्जासह आपली जमीन आणि घर गहाण ठेवावे लागले आहे. विवेक म्हणतो की, कोणत्याही मुलाला त्रास होणार नाही हे सुनिश्चित करणे हे त्याचे उद्दीष्ट आहे. कारण त्यांचे आई-वडील या आजारावरील उपचार आणि खर्च करण्यास असमर्थ आहेत. तो पुढे म्हणतो की, जर या लढाईतून जिंकण्याचा मार्ग असेल, तर प्रत्येक मुलास संधीचा हक्क आहे.
जेव्हा तो मागे वळून कर्करोगाने पीडित असलेल्या युवा व्यक्तींसोबतचा आपला प्रवास आठवतो, तेव्हा तो सांगतो की, “मी स्वत: ला धन्य मानतो. कारण मला या देवदूतांसोबत मिळून आपल्या क्षमतेनुसार त्यांची मदत करण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील हसू मला त्यांच्यासोबत राहण्यास प्रेरित करते. मी सर्वांना पुढे येऊन या सर्वांची मदत करण्याची विनंती करतो, जे इतर मुलांपेक्षा वेगळे नाहीत.”
विवेक म्हणतो की, “ग्रामीण भारतात शेतकरी कुटुंबाच्या २.५ लाखांपेक्षा अधिक गरीब मुलांना कर्करोग, आर्थिक आणि भावनात्मक मदत करणे, हीच माझ्या मागील १८ वर्षांतील सर्वात मोठी कामगिरी आहे.”