Tuesday, October 8, 2024
Home बॉलीवूड ‘माझा वापर करून अक्षयने मला सोडून दिले’, ब्रेकअपनंतर शिल्पा शेट्टीने केला होता खुलासा

‘माझा वापर करून अक्षयने मला सोडून दिले’, ब्रेकअपनंतर शिल्पा शेट्टीने केला होता खुलासा

बॉलिवूडमध्ये अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांनी इंडस्ट्रीला अनेक हिट सिनेमे दिले आहेत. अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केल्यानंतर शिल्पा आणि अक्षय हे दोघेही एकमेकांच्या अथांग प्रेमात बुडाले होते. त्या दोघांचं नातं बरेच वर्ष प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनला होता. सगळ्या प्रेक्षकांना असे वाटत होते की, ते दोघेही लवकरच लग्न बंधनात अडकतील. परंतु असे काहीच झाले नाही. त्यांच्या ब्रेकअपनंतर काही दिवसातच अक्षयने ट्विंकल खन्ना हिच्याशी विवाह केला. त्यानंतर शिल्पाने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला होता की, अक्षयने ट्विंकल खन्नासोबत लग्न करून मला धोका दिला.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने जरी ट्विंकल खन्नासोबत लग्न केलं असलं, तरी त्या आधी तो अनेक अभिनेत्रींसोबत रिलेशनमध्ये होता. रवीना टंडनपासून ते शिल्पा शेट्टीपर्यंत सगळ्या अभिनेत्री त्याच्या आयुष्यात आल्या होत्या. यादरम्यान अक्षय कुमारची ओळख बॉलिवूडमध्ये प्लेबॉय अशी झाली होती.

एका मुलाखतीमध्ये शिल्पा शेट्टीने त्यांच्या नात्याबाबत उलगडा केला. मला अक्षयने फसवलं आहे असा आरोप ती अक्षय कुमारवर करते. अक्षय कुमार सोबत ती खूपच सीरियस रिलेशनमध्ये होती. पण तिला धोका मिळाला असे देखील ती सांगते. ती म्हणते की अक्षयने ट्विंकल खन्नासाठी मला धोका दिला आहे. त्यात शिल्पा शेट्टीने असा देखील आरोप केलाय की, ‘अक्षयने माझा दोन वेळा वापर करून मला सोडून दिले होते.’

शिल्पाने या मुलाखतीमध्ये असे देखील सांगितले आहे की, ‘अक्षय त्याच्या गर्लफ्रेंडला विश्वासात घेण्यासाठी त्यांना डायरेक्ट लग्नासाठी मागणी घालायचा. अक्षय त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन रात्री उशिरापर्यंत मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात घेऊन जात असे. तिथे तिला त्यांच्या भविष्याची स्वप्नं दाखवून लग्नाचे वचन देत असायचा. पण अक्षयला परत एखादी नवीन मुलगी आवडायला लागली, तर अक्षय दिलेली सगळी वचनं विसरून जात असे.’

शिल्पा शेट्टीसोबतच असेच काही आरोप रवीना टंडन हिनेसुद्धा अक्षय कुमारवर केले होते. तिने सुद्धा तिच्या एका मुलाखतीमध्ये असे सांगितले होते की, ‘अक्षय आपल्या प्रत्येक गर्लफ्रेंडला ती आपल्यासाठी खूप खास आहे, असा समज करून देत होता. परंतु नंतर तो त्याची सगळी वचनं आणि दाखवलेल्या स्वप्नांपासून पळवाट शोधत असे.’

अक्षय कुमारने रवीना आणि शिल्पा या दोघींसोबत पडद्यावर खूप काम केले आहे. त्यांच्या जोडीला चाहत्यांकडून प्रेम देखील मिळाले होते. त्यांच्या चाहत्यांमध्ये अशी देखील चर्चा होती की, अक्षय कुमारने शिल्पा शेट्टी आणि रवीना टंडन या दोघींसोबतही लग्न केलं आहे.

परंतु 17 जानेवारी 2001 मध्ये अक्षय कुमारने ट्विंकल खन्नासोबत लग्न केले. ही जोडी बॉलिवूडमधील खूप लोकप्रिय जोडी मानली जाते. अक्षय आणि ट्विंकलला आता 2 मुले आहेत. ते दोघेही त्यांच्या आयुष्यात अत्यंत सुखी आहेत.

हेही वाचा-

किंग खानपासून ते फिट अभिनेत्री शिल्पा शेट्टीपर्यंत ‘या’ दिग्गज कलाकारांनी केला अपत्यप्राप्तीसाठी सरोगसीचा वापर

यालाच म्हणतात ‘आंखो का धोका’, शिल्पा शेट्टीचा नवीन व्हिडिओ पाहून तुम्हीही असेच म्हणाल

शिल्पा शेट्टीला शुभेच्छा देणं पडलं भलतंच महागात, चाहत्यांनी चांगलेच घेतले फैलावर

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा