Sunday, June 8, 2025
Home साऊथ सिनेमा नागार्जुन अन् नागा चैतन्यला आवडत नव्हती समंथाची ‘ही’ सवय; घटस्फोटासाठी अभिनेत्रीने मागितली ५० कोटींची पोटगी

नागार्जुन अन् नागा चैतन्यला आवडत नव्हती समंथाची ‘ही’ सवय; घटस्फोटासाठी अभिनेत्रीने मागितली ५० कोटींची पोटगी

कलाकारांचे अभिनयसोबतच वैयक्तिक आयुष्यही कित्येकदा चर्चेत येते. अनेक कलाकारांच्या रिलेशनशिप आणि लग्नाविषयी मनोरंजन विश्वात चर्चा सूरू असतात. शिवाय त्यांच्या ब्रेकअप विषयी बातम्याही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. बाॅलिवूडमधील असे कित्येक अभिनेते आहेत, ज्यांना लग्नापूर्वी त्यांच्या पत्नीने केलेले बोल्ड फोटोशूट आणि व्हिडिओ शूट चालत होते. पण लग्नानंतर हेच सीन शूट करण्यासाठी या अभिनेत्यांची परवानगी नसते आणि याच कारणावरून अनेकांनी घटस्फोट देखील घेतले आहे. अशीच एक बातमी सध्या व्हायरल होत आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य विभक्त होणार असल्याचे म्हटले जात आहे. सध्या त्यांच्या नात्याची प्रचंड चर्चा सूरू आहे.

नागा चैतन्य आणि समंथा यांच्याविषयीची ही माहिती ऐकुन अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. त्यांच्यामध्ये आलेल्या या दुराव्यामुळे चाहेते खूप दुःखी झाले आहेत. त्या दोघांच्याही चाहत्यांची इच्छा आहे की, त्या दोघांनी लवकरात लवकर एकत्र यावे. माध्यमातील वृत्तानुसार, समंथा आणि नागा चैतन्य यांच्यातील दुराव्याचे कारण समंथाचे चित्रपटांवर असलेलं प्रेम आहे. तिचे चित्रपटावरील प्रेमच या नात्यामध्ये खटके उडवण्याचे कारण ठरत आहे. लग्नानंतरही समंथा तिचे करिअर आणि ग्लॅमरस वर्कफ्रंट एखाद्या महत्त्वाकांक्षी महिलेप्रमाणे सोडत नाहीये.

समंथाचा पती आणि कुटुंबातील व्यक्ती तिला पडद्यावर काम करण्यास नकार देत आहेत. तर तिची सासू अमला तिला गोष्टीवर समजावून सांगत आहे. परंतू समंथा तिचा निर्णय बदलण्यासाठी तयार नाही. दरम्यान, ‘फॅमिली मॅन २’ या सुप्रसिद्ध वेब सीरिजमध्ये समंथाने साकारलेल्या धाडसी व्यक्तिरेखेसाठी तिचे प्रचंड कौतुक केले जात आहे. परंतु, समंथाच्या या निर्णयामुळे संपूर्ण कुटुंब नाराज झाले आहे. याचा परिणाम म्हणजे यांचे नाते आता घटस्फोटापर्यंत पोहोचले आहे. समंथा आणि चैतन्य २०१० पासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यांनी ६ऑक्टोबर २०१७ रोजी लग्न केले.

माध्यमातील वृत्तानुसार, समंथा आणि चैतन्य यांनी घटस्फोटाची तयारी केली आहे. ते दोघे कौटुंबिक न्यायालयात पोहोचले. त्या दोघांनी अद्यापही निर्णय बदललेला नाही. दोघेही विभक्त होण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. तसेच पुढील प्रक्रिया दोन ते तीन महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर घटस्फोट देण्यासाठी समंथाने तब्बल ५०कोटी रुपयांची पोटगी मागितली आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Bigger Boss 15: शोमध्ये सहभागी होणाऱ्या ‘या’ पाच स्पर्धकांच्या नावावर शिक्कामोर्तब

-अनोख्या फॅशन सेन्समुळे पुन्हा चर्चेत आली उर्फी जावेद, व्हायरल फोटोवर ट्रोलर्सचा निशाणा

-जेव्हा अक्षय कुमारवर झाला होता जीवघेणा हल्ला; आवाज जरी केला, तर झाडल्या गेल्या असत्या गोळ्या

हे देखील वाचा