Monday, July 1, 2024

‘त्याने’ एकदा नाही तर दोनदा माझा विश्वासघात केला… दीपिकाने लावले ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्यावर आरोप!

बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांचे वाढदिवस हे गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. १ जानेवारी रोजी तर जवळपास ३ ते ४ कलाकारांचे वाढदिवस होते. आता सुद्धा ५ जानेवारी रोजी बॉलिवूडच्या टॉप ५ अभिनेत्रींपैकी एक असलेली तसेच एका सिनेमासाठी तब्बल २९ कोटी रुपये फी आकारणारी कलाकार म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी दीपिका पदुकोण हीचा वाढदिवस असतो. आजच्या घडीला दीपिका ही भारतातील नंबर १ ची तसेच सर्वात महागडी अभिनेत्री आहे हे हे काही वेगळं सांगायला नको. पण तरी सुद्धा ती एक माणूस आहे. तिलाही  भावना आहेत आणि या भावनांशी जर कुणी खेळलं तर एखाद्या सामान्य मुलीची जी अवस्था होइल अगदी तशीच अवस्था दीपिकाचीही झाली होती. दीपिका सुद्धा नैराश्यात गेली होती. नेमकं काय प्रकरण होतं कशामुळे तिच्या आयुष्यात असा प्रसंग आला हे आज आपण पाहणार आहोत. कदाचित दीपिकाच्या आतापर्यंतच्या आयुष्यातील सर्वात वाईट अनुभवाविषयी आज आपण बोलणार आहोत.

बॉलिवूडची मस्तानी बाई दीपिकाने २०१८ मध्ये अभिनेता रणवीर सिंहसोबत लग्न केलं. संपूर्ण देशभर या लग्नाची चर्चा रंगली होती. लग्नापूर्वी काही वर्षे दीपिका आणि रणवीर सिंह हे एकमेकांना डेट करत होते. परंतु आपल्याला ठाऊक आहेच की दीपिकाच्या आयुष्यात रणवीर सिंहने एन्ट्री मारण्याअगोदर रणबीर कापूरसोबत ती रिलेशनमध्ये होती. २००७ मध्ये दीपिका रणबीर सोबत रिलेशनमध्ये आली आणि फक्त दोनच वर्षात म्हणजे २००९ मध्ये या दोघांचंही ब्रेक अप झालं. दोघांच्याही लग्नाच्या शक्यता समोर येत असताना अचानक ब्रेकअपच्या बातम्या कानावर पडल्याने सगळेच जण त्यावेळी अवाक् झाले होते. काही वर्षांपूर्वी माध्यमांशी बोलताना रणबीर सोबतच्या ब्रेकअपचं कारण सांगितलं होतं आणि त्याच्यावर नाव न घेता आरोपही केले होते.

एका मुलाखतीत दीपिकाने सांगितले की त्याने आधी फसवणूक केली होती आणि नंतर माफी मागण्यास सुरूवात केली. दीपिका म्हणाली, ‘माझ्यासाठी सेक्सचा अर्थ केवळ शारीरिक असणं नाही तर त्यात भावनाही गुंतलेल्या असतात. मी जेव्हा त्याच्यासोबत नात्यात होते तेव्हा त्याचा कधीच विश्वासघात केला नाही. जर मला फसवणूकच करायची असती तर मी त्याच्यासोबत नात्यातच आले नसते. मी अविवाहित राहणं आणि मजा मस्ती करणं हे अधिक पसंत नसतं का केलं. पण प्रत्येकजण असं करत नाही, म्हणून मला आधी खूप त्रास सहन करावा लागला. मी इतकी मूर्ख होते की मी त्याला फसवणूक करताना रंगेहात पकडला आणि तरीसुद्धा तेव्हा मी त्याला दुसरी संधी दिली.’

दीपिका पुढे म्हणाली, ‘नंतर त्याने माझ्याजवळ अक्षरशः भीक मागितली आणि विनवणी केली, म्हणून मी त्याला माफ केलं पण तो माझा मूर्खपणा होता. या गोष्टींमधून बाहेर पडण्यासाठी मला बराच काळ लागला. परंतु आता मी या सर्व आठवणींमधून बाहेर आली आहे, आता पुन्हा मला कोणीही त्या आठवणींमध्ये घेऊन जाऊ शकणार नाही. जेव्हा त्याने पहिल्यांदा माझी फसवणूक केली तेव्हाच मला वाटलं होतं की आमच्या नात्यात अडचण येईल. परंतु जेव्हा एखाद्याची सवयच फसवणूक करण्याची असते तेव्हा तो तेच करतो.”

ती पुढे म्हणाते, ‘मी माझ्या रिलेशनशिपमध्ये खूप काही दिले, पण मला काहीही मिळालं नाही. फसवणूक म्हणजे कोणत्याही नात्याचा ब्रेकर. जेव्हा नात्याची फसवणूक होते, तेव्हा मनातील आदर निघून जातो, आत्मविश्वास निघून जातो, कारण हेच तुमच्या नात्याचे आधारस्तंभ आहेत ज्यांना आपण खंडित करू शकत नाही.’

तर दीपिकाने या प्रकरणात काय म्हटलं हे आपण ऐकलंत. या सगळ्या प्रकारानंतरही दीपिका आणि रणबीर यांनी प्रोफेशनलिझम दाखवत ये जवानी है दिवानी, तमाशा यांसारखे चित्रपट एकत्र केले आणि ते बॉक्स ऑफिसवर यशस्वी देखील ठरले होते.

आता सुद्धा दीपिका आणि रणवीर नविन वर्षाच्या स्वागतासाठी राजस्थानच्या ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्याच हॉटेलमध्ये रणबीर, त्याची आई आणि त्याची प्रेयसी आलीया भट्ट हे देखील थांबले होते. इतकंच काय तर या सगळ्यांनी एकत्र फोटोशूटही केलं होतं. दीपिकानंतर रणबीर कपूर हा कतरीना कैफ सोबत काही काळ रिलेशनमध्ये राहिला आणि कतरीनासोबत ब्रेकअप झाल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून रणबीर आणि आलीया एकमेकांना डेट करत आहेत.

हे देखील वाचा