Monday, July 1, 2024

“सलमानसाठी सर्वात सुरक्षित जागा…” सलमान खानच्या सुरक्षेवर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

सलमान खान सध्या विविध कारणांमुळे सतत प्रकाशझोतात येत आहे. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीदरम्यान त्याने अनेक मुद्द्यांवर भाष्य केले होते. यावेळी तो भारतापेक्षा दुबई जास्त सुरक्षित असल्याचे म्हटले होते. त्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले गेले. शिवाय त्याच्या या विधानावर अनेक कलाकार आणि नेत्यांनी प्रतिक्रिया देखील दिल्या. नुकतीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

मागील काही दिवसांपासून सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईकडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे. यामुळे त्याला मोठी सुरक्षा देखील देण्यात आली आहे. काळवीट हत्या प्रकरणी त्याला या धमक्या मिळत आहे. मात्र त्याला या धमक्यांमुळे काहीही फरक पडत नसल्याचे त्याने सांगितले. तो भारतात असुरक्षित आहे, दुबईमध्ये नाही हे देखील तो यावेळी म्हणाला होता.

सलमान खानला देण्यात आलेल्या सुरक्षेबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सलमान खानला देण्यात आलेली सुरक्षा सर्वोच्च दर्जाची आहे. त्याला मुंबईत किंवा भारतात कुठेही फिरायला काहीही हरकत नाही. मला वाटते की सलमान खानसाठी मुंबईपेक्षा कुठलीही जागा सुरक्षित नाही.” दरम्यान सरकारने सलमान खानला Y+ कॅटॅगिरीची सुरक्षा दिली आहे. यात तो सतत ११ सुरक्षा रक्षकांसोबत चालतो. यात २ कमांडो आणि २ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

तत्पूर्वी सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्याचा नुकताच ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांनी सरासरी प्रतिसाद दिला. लवकरच सलमान यश राजच्या ‘टायगर 3’ मध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘TDM’ सिनेमाला स्क्रीन मिळत नसल्याने कलाकारांना अश्रू अनावर, दिग्दर्शक म्हणाले, “अशा भेदभावामुळे माझी चित्रपट बनवण्याची… ”

‘नुकतेच मी माझे घर विकले’ आर्यन खानचा ब्रँड म्हणजे निव्वळ मस्करी, किंमती एकल तर हैराण व्हाल

हे देखील वाचा