Wednesday, June 25, 2025
Home बॉलीवूड ‘भारतातले म्हणतात पाकिस्तानात जा, पाकिस्तानवाले म्हणतात भारतात जा’, प्रसिद्ध दिग्दर्शकाने व्यक्त केला संताप

‘भारतातले म्हणतात पाकिस्तानात जा, पाकिस्तानवाले म्हणतात भारतात जा’, प्रसिद्ध दिग्दर्शकाने व्यक्त केला संताप

प्रसिद्ध दिग्दर्शक कबीर खान (Kabir Khan) यांच्या ‘८३’ चित्रपटाचे सर्वत्र कौतुक झाले होते. भारतीय क्रिकेट संघांने जिंकलेल्या पहिल्या विश्वचषकाच्या वेळीचा आणि कपिलदेवच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात रणवीर सिंगने (Ranveer Singh) प्रमुख भूमिका साकारली आहे. मात्र सध्या त्यांची एक मुलाखत चर्चेत आहे. ज्यामध्ये त्यांनी राष्ट्रवाद आणि देशभक्तीवर आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक कबीर खान यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत देशभक्ती आणि राष्ट्रवादावर खुलेपणाने भाष्य केले. त्यांना सतत ट्रोल करतात आणि त्याला पाकिस्तानात जाण्यास सांगतात, अशा लोकांबद्दल त्यांनी आपले हे परखड मत व्यक्त केले आहे. सोशल मीडियावर लोक जेव्हा टीका करतात तेव्हा वाईट वाटते, असेही ते म्हणाले. त्यांच्या मते, त्यांना वाटते की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने ट्रोल करणाऱ्यांना काहीही बोलण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. सध्या त्यांच्या या मुलाखतीची सगळीकडे चर्चा होत आहे.

एका मुलाखतीत बोलताना ते म्हणाले की, “सध्या सोशल मीडियामुळे लोकांना काहीही बोलण्याची सूट मिळाली आहे. १० वर्षापूर्वी अशी स्थिती अजिबात नव्हती. त्यावेळी लोक असे काहीही बोलत नव्हते. मात्र आता सोशल मीडियामुळे लोकांना कोणत्याही विषयावर बोलायची सवय लागली आहे. त्यांना कोणत्याही प्रकारच्या सामाजिक जबाबदारीचे भान राहिले नाही. हे चित्र पाहून वाईट वाटते पण हीच सत्य परिस्थिती आहे. सध्या सोशल मीडियाची परिस्थिती पाहून नकारात्नक गोष्टीच जास्त पसरवल्या जातात” असेही मत व्यक्त केले आहे.

कबीर खान पुढे म्हणतात की, “माझे नाव खान आहे आणि त्यामुळे मला पाकिस्तानला जाण्यास सांगण्यात आले. पण मी एकदा पाकिस्तानात गेलो होतो, तिथे लष्कर-ए-तैयबाने मला भारतात परत जाण्यास सांगितले. म्हणजे मी इथलाही नाही आणि तिथलाही नाही.” देशभक्ती आणि राष्ट्रवाद यावर बोलताना दिग्दर्शक म्हणाले की, प्रत्येक चित्रपट दिग्दर्शक-निर्मात्याने स्वतःचे प्रतिबिंब असले पाहिजे. आपण कधी कधी चित्रपटांमध्ये तिरंगा दाखवतो, पण आज देशभक्ती आणि राष्ट्रवाद यात फरक आहे. असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

आपल्या ‘८३’ या चित्रपटाचे उदाहरण देताना ते म्हणाले की, “राष्ट्रवादासाठी आपल्याला काउंटरपॉइंट खलनायक हवा आहे, परंतु देशभक्तीसाठी आपल्याला अशा कोणत्याही गोष्टीची गरज नाही.” या चित्रपटात रणवीर सिंगने कपिल देव यांची भूमिका साकारली होती. त्याचवेळी दीपिका पदुकोण त्याची पत्नी रोमी भाटियाच्या भूमिकेत दिसली होती. याशिवाय साकिब सलीम, हार्डी संधू, ताहिर राज भसीन, एमी विर्क, जतीन सरना आणि इतर कलाकार या चित्रपटात त्या दिग्गज क्रिकेटपटूंच्या भूमिका साकारताना दिसले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

हे देखील वाचा