बॉलिवूड हे असं ठिकाण आहे जिथे नाती मैत्री सर्व सापडतात खरे, मात्र नंतर पुसाट झालेली पण दिसतात. नात्याच्या आणि मैत्रीच्या कहाण्या आपण आजवर वाचल्या असतील. पण नव्या युगात इथे गुंजत असल्या तरी पाहायला मिळतील जेव्हा या मायानगरीची निर्दयी वृत्तीने अशा तारकांना काळापूर्वी बुडायला भाग पाडले, ज्यांच्या तेजामुळे हे शहर कधीकाळी गजबजले होते.
असाच आज एक दिवस एका महान कलाकाराला आठवण्याचा आहे ते म्हणजे राजकिरण. ऐंशीच्या दशकात राजकिरण यांनी ‘अर्थ’, ‘कर्ज’, ‘घर हो तो ऐसा’, ‘घर एक मंदिर’ यासारख्या सुपरहिट चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. आज ५ फेब्रुवारी रोजी त्यांचा वाढदिवस आहे. राजकिरणने चित्रपटांमध्ये अनेक छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या, अनेक सुपरस्टारसोबत नाव कमावले, ते आज कुठे आहे काय करतात हे कोणालाच ठाऊक नाही.
खूप वर्षांपूर्वी त्यांच्या मैत्रिणीने आणि अभिनेत्री दीप्ती नवल हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून मोहीम चालवली होती की, राजकिरण हे कुठे, जर कोणाला माहित असेल तर सांगा. त्यानंतर २०११ मध्ये ऋषी कपूरने अमेरिकेत मानसिक आश्रयातून राजकिरण यांचा शोध घेतला आणि ते सापडले.
त्यावेळी संपूर्ण शहरासह देशालाही धक्का बसला होता की, एक एवढा मोठा प्रसिद्ध स्टार अचानक दुसऱ्या देशातील पागलखान्यात कसा पोहोचला असेल. ऋषी कपूर यांनी राजकिरणसोबत ‘कर्ज’ या चित्रपटात काम केले होते आणि राजकिरणला पाहून खूप मोठा धक्का बसला. अखेर राजकिरण काय झालं?
त्यानंतर त्यांचा भाऊ गोविंदा मेहता यांनी ऋषी यांना राजकिरण बद्दल जे सांगितले ते इंडस्ट्रीची निर्दयी वृत्ती दाखवणुयासाठी. जेव्हा राजकिरणला कमी चित्रपट मिळू लागले, तेव्हा त्याला टीव्हीकडे वळावे लागले. त्यांनी शेखर सुमनसोबत मनोरंजनमध्ये काम केले पण त्यांना फारसे काम मिळत नव्हते आणि कुटुंब देखील त्यांच्यापासून दूर जाऊ लागले त्यामुळे ते अमेरिकेला गेले.
तिथे जाऊन राजकिरण हे टॅक्सी चालू लागले आणि ते तिथेच स्थायिक झाले. पण त्यांची बायको आणि मुले त्यांना एकटे सोडून गेले. त्यावेळेस मात्र त्यांना फार दुःख झाले. त्यांना वेदना सहन नाही झाले इतकंच नाही, तर त्यांना वेदना सांगता येईल असे मित्र नव्हते, त्यामुळे ते डिप्रेशनमध्ये गेले. डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यांनी त्यांच्यावर उपचार करण्याऐवजी त्यांना अटलांटा येथील मानसिक आश्रयस्थनाथत दाखल केले कारण त्यांच्या उपचारांचा खर्च कोणालाच उचलायचा नव्हता.
ऋषी कपूर आणि दीप्ती नवलसोबतच, इंडस्ट्रीतील इतर अनेक कलाकारांनी राजकिरण परतल्यावर त्यांच्या मदतीबद्दल बोलले नाही, परंतु राजकिरण तेव्हा परत येऊ शकले नाही आणि त्यानंतर त्यांच्याबद्दल कोणतीही बातमी आली नाही.
मात्र, राजकिरणच्या कुटुंबाचे म्हणजेच त्यांच्या पत्नीचे म्हणे आहे की, कुटुंबाने त्यांना सोडून दिल्याच्या बोलण्यात तथ्य नाही. त्यांच्या कुटुंबीयांनी ते हरवल्याची तक्रार नोंदवली होती आणि पोलीस अनेक वर्षांपासून त्यांचा शोध घेत होते. सध्या राजकिरण कुठे आहेत हे कोणाला माहित नाही पण ते जिथे असतील तिथे निरोगी आणि सुरक्षित असावे, हीच इच्छा.
हेही वाचा :
ऐश्वर्या रॉयचे लग्न पाहण्यासाठी ‘या’ अभिनेत्याने वापरली होती दुर्बीण, झाला ‘त्या’ घटनेचा खुलासा
अभिनयाचा वारसा असूनही अभिषेक बच्चनला करावा लागलतो होता चित्रपटसृष्टीत संघर्ष, वाचा त्याची कहाणी