Saturday, July 6, 2024

‘इथे’ झाली होती हितेन तेजवानी आणि गौरी यांची पहिली भेट, वाचा त्यांची फिल्मी प्रेमकहाणी

टीव्हीचा हँडसम अभिनेता हितेन तेजवानी टीव्हीच्या दुनियेत उत्कृष्ट अभिनयासाठी आणि शांत आणि साध्या स्वभावासाठी ओळखला जातो. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, टीव्हीवर नेहमीच सरळ व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांच्या मनात सकारात्मक प्रतिमा निर्माण करणाऱ्या हितेनचे वैयक्तिक आयुष्य खूप वादग्रस्त राहिले आहे. हितेनबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे की, हितेनने दोन लग्न केले आहेत. त्याचे पहिले लग्न अयशस्वी ठरले होते आणि अभिनेत्याचे दुसरे लग्न गौरी प्रधान तेजवानीशी आहे. हितेन शनिवारी त्याचा ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर मग हितेन तेजवानीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्याशी संबंधित काही खास गोष्टी.

‘या’ चित्रपटात दिसणार आहे

महाराष्ट्रात ५ मार्च १९७४ रोजी जन्मलेल्या हितेन तेजवानीने (Hiten Tejwani) २००० साली ‘घर एक मंदिर’मधून टीव्हीच्या दुनियेत प्रवेश केला. यानंतर तो ‘कुटुंब’, ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘कभी सौतन कभी सहेली’, ‘कुसुम’ आणि ‘पवित्र रिश्ता’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये दिसला. टीव्हीवरील रियॅलिटी शो ‘बिग बॉस सीझन ११’ मध्येही तो पाहायला मिळाला.

येत्या काळात हितेन तेजवानी ‘कॉफी बग’ या शॉर्ट फिल्ममध्ये ग्रे शेडच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. यानंतर तो ‘स्वांग’ या वेब शोमध्ये दिसणार आहे. याशिवाय तो रुबीना दिलैकसोबत (Hiten Tejwani) ‘अर्ध’ चित्रपटात दिसणार आहे. हितेनचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

‘यामुळे’ मोडले पहिले लग्न 

हितेन तेजवानीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे की, गौरी प्रधान (Gauri Pradhan) ही हितेश तेजवानीची दुसरी पत्नी आहे. एका मुलाखतीदरम्यान आपल्या पहिल्या लग्नाबद्दल बोलताना अभिनेत्याने सांगितले की, त्याचे पहिले लग्न का अयशस्वी झाले आणि त्याने आपल्या पत्नीला घटस्फोट का दिला.

माध्यमांतील वृत्तानुसार, अभिनेत्याचे पहिले लग्न अरेंज्ड मॅरेज होते, जे त्याच्या मनाविरुद्ध झाले होते. कौटुंबिक दबावाखाली त्याने हे लग्न केले होते. त्याचे हे लग्न फार काळ टिकले नाही आणि ११ महिन्यांनंतर त्याचे लग्न तुटले. त्यादरम्यान हितेनने सांगितले होते की, टीव्ही इंडस्ट्रीत येण्यापूर्वी त्याचे लग्न झाले होते आणि तो अभिनयाच्या जगात आपले नाव कमवण्यासाठी धडपडत होता. अशा परिस्थितीत तो आपल्या पत्नीला वेळ देऊ शकला नाही, ज्याची ती पात्र होती. अरेंज्ड मॅरेजमध्ये लग्नानंतर प्रेम होतं असं म्हणतात, पण त्याच्या बाबतीत असं कधीच घडलं नाही.

गौरी प्रेमात पडली आणि त्यांची परस्पर समज इतकी चांगली होती की, त्यांनी लग्नही केले. लग्नानंतर आता हे जोडपे आनंदाने एकत्र राहत आहे. २९ एप्रिल २००२ रोजी या जोडप्याचा विवाह झाला. ११ नोव्हेंबर २००९ रोजी हितेन आणि गौरी जुळ्या मुलांचे पालक झाले. टीव्ही शो ‘कुटुंब’, ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ तसेच रियॅलिटी डान्स शो ‘नच बलिये’मध्ये या जोडप्याने आपली जबरदस्त केमिस्ट्री सादर केली होती.

गौरीच्या प्रेमात ‘असा’ पडला अभिनेता 

हितेन तेजवानी आणि अभिनेत्री गौरी प्रधान यांची जोडी टीव्हीची सर्वात आवडती ‘रील टू रिअल लाइफ’ जोडी मानली जाते. ‘कुटुंब’ या मालिकेत दोघांची भेट झाली होती. हितेन आणि गौरी यांची पहिली भेट विमानतळावर झाल्याचे बोलले जात असले तरी. पहिले लग्न मोडल्यानंतर १९९९ मध्ये हितेन एका जाहिरात चित्रपटाच्या शूटिंगसाठी बंगळुरूला जात होता. गौरीचा साधेपणा हितेनला पहिल्या भेटीतच आवडला होता. गौरी सेटवर खूप गंभीर होती, त्यामुळे तिची हितेनशी बोलण्याची हिंमत होत नव्हती. काम संपवून दोघेही परत गेले आणि सहा महिने दोघांमध्ये बोलणे झाले नाही.

हेही वाचा –

 

 

हे देखील वाचा